शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ९, पंचायत समितीच्या १८ जागा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:06 IST

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे.

कोल्हापूर : मंत्रिमंडळामध्ये सोमवारी झालेल्या निर्णयानुसार आता कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे. जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, गडहिंग्लज या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात हे मतदारसंघ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सध्या जिल्हा परिषदेचे ६७ सदस्य असून पंचायत समितीचे १३४ सदस्य आहेत. जिल्ह्यात आजरा, चंदगड, हातकणंगले, हुपरी या नगरपंचायती आणि नगरपालिका झाल्याने त्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आता या रचनेतून कमी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या मतदारसंघांची रचना बदलणार हे नक्की आहे.

अशातच मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत लोकसंख्येच्या सध्याच्य स्थितीवर आधारित सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०११ नंतर वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून हे मतदारसंघ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे ९ जिल्हा परिषद सदस्य आणि १८ पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत.

जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करताना किमान ४० हजारांची लोकसंख्या गृहीत धरली जाते. मात्र करवीर, कागल, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यात मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. त्यामुळे हे वाढीव मतदारसंघ या तालुक्यात प्राधान्याने होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. या वाढीव मतदारसंघांची अधिकृत अधिसूचना निघाल्यानंतर याबाबत निश्चितता येणार आहे.

जुन्या आराखड्याप्रमाणे आजऱ्याला दणका

२०११ च्या लोकसंख्येनुसार महसूल विभागाकडून जे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आजरा नगरपंचायतीची स्थापना झाल्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द होणार आहे. तर कागल आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी एक मतदारसंघ वाढणार आहे. मात्र आता सध्याची लोकसंख्या गृहीत धरता आजऱ्याचा मतदारसंघ टिकण्याची शक्यता आहे.

पक्षीय रस्सीखेच वाढणार, समझोत्याला उपयुक्त

एकीकडे ९ जिल्हा परिषद सदस्य आणि १८ पंचायत समिती सदस्य वाढणार असल्याने याचा महाविकास आघाडीला फायदा ठरण्याची शक्यता आहे. कारण तीनही पक्षाच्या इच्छुकांमध्ये समझोता करताना कमी जागांचा प्रश्न होता. मात्र आता जागा वाढल्यामुळे एकीकडे राजकीय रस्सीखेच वाढणार असली तरी जागा वाटपामध्ये शब्द पाळण्यासाठी वाढलेल्या जागा उपयुक्त ठरणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरZP Electionजिल्हा परिषद