शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ९, पंचायत समितीच्या १८ जागा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:06 IST

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे.

कोल्हापूर : मंत्रिमंडळामध्ये सोमवारी झालेल्या निर्णयानुसार आता कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे. जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, गडहिंग्लज या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात हे मतदारसंघ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सध्या जिल्हा परिषदेचे ६७ सदस्य असून पंचायत समितीचे १३४ सदस्य आहेत. जिल्ह्यात आजरा, चंदगड, हातकणंगले, हुपरी या नगरपंचायती आणि नगरपालिका झाल्याने त्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आता या रचनेतून कमी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या मतदारसंघांची रचना बदलणार हे नक्की आहे.

अशातच मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत लोकसंख्येच्या सध्याच्य स्थितीवर आधारित सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०११ नंतर वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून हे मतदारसंघ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे ९ जिल्हा परिषद सदस्य आणि १८ पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत.

जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करताना किमान ४० हजारांची लोकसंख्या गृहीत धरली जाते. मात्र करवीर, कागल, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यात मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. त्यामुळे हे वाढीव मतदारसंघ या तालुक्यात प्राधान्याने होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. या वाढीव मतदारसंघांची अधिकृत अधिसूचना निघाल्यानंतर याबाबत निश्चितता येणार आहे.

जुन्या आराखड्याप्रमाणे आजऱ्याला दणका

२०११ च्या लोकसंख्येनुसार महसूल विभागाकडून जे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आजरा नगरपंचायतीची स्थापना झाल्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द होणार आहे. तर कागल आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी एक मतदारसंघ वाढणार आहे. मात्र आता सध्याची लोकसंख्या गृहीत धरता आजऱ्याचा मतदारसंघ टिकण्याची शक्यता आहे.

पक्षीय रस्सीखेच वाढणार, समझोत्याला उपयुक्त

एकीकडे ९ जिल्हा परिषद सदस्य आणि १८ पंचायत समिती सदस्य वाढणार असल्याने याचा महाविकास आघाडीला फायदा ठरण्याची शक्यता आहे. कारण तीनही पक्षाच्या इच्छुकांमध्ये समझोता करताना कमी जागांचा प्रश्न होता. मात्र आता जागा वाढल्यामुळे एकीकडे राजकीय रस्सीखेच वाढणार असली तरी जागा वाटपामध्ये शब्द पाळण्यासाठी वाढलेल्या जागा उपयुक्त ठरणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरZP Electionजिल्हा परिषद