शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोल्हापूर : चौथीतील विद्यार्थ्यांनी लिहिली गोष्टीची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 16:12 IST

अनुभव, कल्पनाविस्तारावर आधारित गोष्टीची पुस्तके चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.

ठळक मुद्देचौथीतील विद्यार्थ्यांनी लिहिली गोष्टीची पुस्तकेनेहरू विद्यालयातील उपक्रम; वाचन-लेखनाला प्रोत्साहन

संतोष मिठारी कोल्हापूर : अनुभव, कल्पनाविस्तारावर आधारित गोष्टीची पुस्तके चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.सध्या अनेक मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील संवाद, वाचन आणि लेखन कमी झाले आहे. बहुतांश मुले स्वत:हून वाचन करतच नाहीत. अशा स्थितीत मुलांना स्वत: गोष्ट लिहून त्याचे पुस्तक तयार करायला लावणे. त्यातून त्यांच्यातील लेखकाचा शोध घेण्यासह त्यांच्या बुद्धिला चालना देण्याचा उपक्रम नेहरू विद्यालयाने केले आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील चौथीच्या २० विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील भाषाविषय सहाय्यक निशा काजवे आणि शिक्षिका सारिका पाटील यांनी प्रशिक्षण दिले.

क्वेस्टअंतर्गत या विद्यार्थ्यांना पुस्तक लेखनाचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘आनंदी विद्यालय’ उपक्रमही राबविण्यात आला. त्यामध्ये पुस्तकांचा दवाखाना, वाचन, चित्रवर्णन, गोष्ट तयार करणे, शाब्दिक कोडी, विविध गणिती खेळ आदींचा समावेश होता. प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांकडून पुस्तके लिहून घेण्यात आली.

नारळ महागला, मदत का? करावी, शिक्षा कोणाला, चूक कोणाची, मदतीचा हात अशा विविध २० गोष्टींचे लेखन या विद्यार्थ्यांनी स्व: अनुभव आणि कल्पनाविस्तारावर आधारित केले. या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वसुधा चव्हाण, शिक्षिका सुधा हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.उपक्रमातील सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनीगोष्टींची पुस्तके लिहिण्याचा हा उपक्रम तीन आठवड्यांचा होता. त्यामध्ये वैदेही चौगले, जागृती राणे, विराज देसाई, साईराज माने, हर्षदा घाटगे, समृद्धी पंडित, समर्थ पाटील, अभिज्ञा मिणचेकर, भक्ती कांबळे, सौजन्या महाडिक, अंकिता पाटील, साक्षी मिणचेकर, संस्कृती तुरूके, प्रथमेश कांबळे, माजिद शानेदिवाण, मयुरी मुदिगौंड, गौरी गिद्दे, नील दळवी, अक्षयनी नलवडे, कल्पना वाघमारे या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. त्यांनी कार्डशीटपेपरवर गोष्टी लिहून पुस्तके तयार केली आहेत. त्यामध्ये त्यांनी पूरक चित्रेही रेखाटली आहेत. आठ ते दहा पानांची पुस्तके आहेत.

 

सध्याच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखन संस्कृती वाढविण्याच्या उद्देशाने विद्यालयाने हा उपक्रम राबविला आहे. या गोष्टीच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चे विचार, कल्पना मांडल्या आहेत. गोष्टीचे पुस्तक लिहिण्याचा हा  उपक्रम आता प्रायोगिक तत्वावर वर्गपातळीवर राबविला असून पुढील टप्प्यात शाळा पातळीवर राबविण्याचा मानस आहे.- सारिका पाटील,वर्गशिक्षिका 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी