शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

परतीच्या पावसाने खरीप पिके आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:22 IST

कोल्हापूर : परतीचा पाऊस रोज झोडपत असल्याने खरीप पिके पाण्यात आडवी झाली आहेत. भुईमूग, सोयाबीनला मोड आले असून भातपीक तर पाण्यावरच तरंगू लागल्याने शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : परतीचा पाऊस रोज झोडपत असल्याने खरीप पिके पाण्यात आडवी झाली आहेत. भुईमूग, सोयाबीनला मोड आले असून भातपीक तर पाण्यावरच तरंगू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पेरणी करून साडेतीन-पावणेचार महिन्यांचा कालावधी झाल्याने भुईमूग, सोयाबीन, भातपीके काढणीस आली आहेत. ज्या काळात पाऊस गरजेचा होता, त्यावेळी त्याने दडी मारली आणि आता काढणीच्या वेळी रोज पाऊस न चुकता हजेरी लावत आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने भुईमूग, सोयाबीन काढायचे कसे, असा पेच निर्माण झाला आहे. परिपक्व झालेल्या भातपिकाला पाऊस सहन होत नाही. जोराचा पाऊस झाला की, भात सरळ जमिनीवर आडवेच होते. पाण्यात दोन दिवस लोंब्या राहिल्या की तिसºया दिवसापासून मोड येण्याची प्रक्रिया सुरू होते.

शुक्रवारी दुपारी मेघगर्जनेसह दीड तास पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर शहरात पाणीच पाणी करून सोडले. शहरातील रस्त्यांना तर नेहमीप्रमाणे तळ्याचे स्वरूप आले होते. रस्त्यांवरील पाणी व पावसाच्या जोरामुळे वाहनधारकांचा वेगही मंदावल्याचे चित्र पाहावयास मिळाले.महिन्यात चार हजार मिलिमीटर पाऊसकोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी २३९१ मिलिमीटर पाऊस पडतो; पण यंदा तब्बल चार हजार मिलिमीटर (२९० टक्के) पाऊस झाला आहे. सहा तालुक्यांत सरासरीच्या २०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.मलकापूर परिसरात नुकसानमलकापूर : मलकापूर परिसरात परतीच्या पावसाने गेले दोन थैमान घातले आहे . या पावसामुळे भात पिकांचे नुकसान होवू लागले आहे . हाता तोंडाला आलेला घास वाया जाणार का या चिंतेत बळीराजा आहे .सकाळी ऊन दुपारी पाऊस असा खेळ निसर्गचा सुरू आहे . दुपार पर्यत वातावरण एकमद म गरम असते . कडक ऊन पडलेले असते . दुपारी दोन वाजले नतंर वातावरणात एकदम बदल होवून सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरतो . एकदम पावसाला सुरवात होते . गेली दोन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे भात पिकांचे नुकसान होवू लागले आहे .भात रताळी भूईमुग सोयाबीन आदी पिके काढणीला आली आहेत . भाताची सुगी चालू झाली आहे . पावसामुळे चालू वर्षी भाताची सुगी लांबण्याची शक्यता आहे . सतत पडत असलेल्या पावसामुळे पिके वाया जाण्याची शक्यता आहे .पाऊस उघडण्याची वाट शेतकरी पाहत आहे . पडणा?्या पावसाचा सध्या तरी बळीराजाला फायदा नसून पिकांचे नुकसान होत आहे . नवरात्रोत्सव देखील पावसातच साजरा झाला .आवळीत वीज पडून दोन म्हशी ठारदेवाळे : आवळीसह परिसरात झालेल्या मुसळदार पावसाने आवळी (ता. पन्हाळा) येथील जगन्नाथ श्रीपती पाटील यांच्या दोन म्हशींवर वीज पडून जागीच मृत्यू झाला.जगन्नाथ पाटील आज सकाळी चारण्यासाठी घेऊन गेले होते. आज सायंकाळच्या सुमारास आवळी परिसरात विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गवत चरत असलेल्या दोन म्हशींच्या अंगावर अचानक वीज कोसळल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या. जगन्नाथ पाटील हेदेखील यामध्ये जखमी झाले आहेत. यात पाटील यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.नुकसान भरपाईसाठी संबंधित अधिकाºयांनी पंचनामा करावा अशी मागणी होत आहे. पावसाने भात पिकांबरोबरच भुईमूग, ऊस, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनेच्या माहितीकडे महसूल विभागाचे डोळेझाकवीज कोसळल्यानंतर घटनेची माहिती ग्रामसेवक व तलाठी यांना देणे क्रमप्राप्त असते. ग्रामपंचायत सदस्य जयवंत कदम यांनी दूरध्वनीवरून महसूल विभागाला या घटनेबाबत सांगण्याचा प्रयत्न केला; पण निर्ढावलेल्या अधिकाºयांनी याकडे डोळेझाक केली.वाघबीळ-माले रस्त्यावर पावसाने पाणी; दोन तास वाहतूक ठप्पदेवाळे/ वार्ताहर - पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ ते माले रस्त्यावर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी आल्याने तीन ठिकाणी सुमारे २ तास वाहतूक ठप्प झाली, तर जोतिर्लिंग पब्लिक स्कूलकडे जाणारा रस्ताच वाहून गेला.आज दुपारी सुमारे १ तास ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाघबीळ ते माले रोड दरम्यान कोडोलकर मळ्याजवळील दोदावी ओढ्यावरील पुलाखाली नळ्यामध्ये झाडांच्या फांद्या अडकल्याने रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते. आज खंडेनवमीमुळे जोतिबा दशर्नाला जाणाºया भाविकांची संख्या जास्त होती. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने येथे वाहतुकीची मोठी गर्र्दी झाली होती. रस्त्यावर पाणी आल्याने दोन तास वाहतूक खोळंबली. रात्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माले गावातील बबलू चौगुले, प्रसाद सूर्यवंशी, राहुल वगरे, विक्रम जमदाडे यांनी ओढ्यात नळयामध्ये झाडांच्या अडकलेल्या फांद्या धाडसाने दूर केल्या. त्यानंतर काही वेळाने रस्त्यावरील पाणी कमी झाले आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली. तर सूर्यवंशी मळा, बावडेकरांची विहीर या ठिकाणी लहान-मोठ्या वघळातून आणि वतातून रास्तावर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी आले होते. माले येथिल जोतिर्लिंग पब्लिक स्कूलकडे जाणारा रस्ताच मुसळधार पावसाच्या पाण्याने वाहून गेला.