शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बांधा एकच चंग; ‘गोकुळ’मध्ये महायुती ठेवा एकसंध; मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:29 IST

डोंगळेंसह सतेज पाटील गटाचे पाच जण अनुपस्थित

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ राज्यातील ताकदवान संघ असून, त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात सहकार चळवळ भक्कम झाल्याचे गौरवोद्गार काढत संघाच्या आगामी निवडणुकीत महायुती म्हणून एकसंध रहा, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह संचालक व नेत्यांना दिला.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय काेरे, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमवेत अध्यक्ष मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, ‘जनसुराज्य’चे समित कदम व संचालकांनी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अध्यक्ष मुश्रीफ यांनी अंबाबाईची मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.‘गोकुळ’कडून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वाशी परिसरात नवीन विस्तारित दुग्ध शाळेसाठी १५ एकरपर्यंत व पुणे येथे नव्या पॅकिंग स्टेशनसाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. संबंधित औद्योगिक वसाहतीमध्ये शिल्लक जागेबाबतचा प्रस्ताव सादर करा, तत्काळ मंजुरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली.डोंगळेंची दांडी, ‘सतेज’ समर्थक संचालकांची अनुपस्थितीमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसारच अध्यक्षपदाचा राजीनामा देत नसल्याचे अरुण डोंगळे यांनी सांगितले होते. त्यातून अध्यक्ष निवडीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. मात्र, दोघांच्या भेटीस डोंगळे यांनी दांडी मारली. आमदार सतेज पाटील गटाचे विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर हे उपस्थित होते. मात्र, बाबासाहेब चौगले, अंजना रेडेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, राजेंद्र मोरे यांच्या अनुपस्थितीची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.गायीप्रमाणे म्हैस दुधालाही अनुदान द्याशासनाने गाय दूध उत्पादकांना अनुदान दिले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात म्हैस दूध उत्पादकांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांनाही अनुदान मिळावे, अशी मागणीही ‘गोकुळ’तर्फे करण्यात आली.

मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमधील अटी शिथिल करामहाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाने २०२५ पासून राज्यात लागू केलेल्या सौरऊर्जा संदर्भातील मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमुळे वाढलेला आर्थिक भार लक्षात घेता, या धोरणाच्या अटी व शर्तींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वच मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.