शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह रुग्णांना, संशयितांना नेण्यासाठी अपुरी वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST

कोल्हापूर : एकाच तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना किंवा त्यांच्या थेट संपर्कात आलेल्यांना नेण्यासाठी वाहनांचीच सोय होत ...

कोल्हापूर : एकाच तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना किंवा त्यांच्या थेट संपर्कात आलेल्यांना नेण्यासाठी वाहनांचीच सोय होत नसल्याने, तालुका पातळीवर अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि ग्रामसेवक हवालदिल बनले आहेत. शासनाकडून यासाठी निधी नाही आणि गावातील कोणीही वाहने देण्यास तयार नाही, दुसरीकडे जिल्हा पातळीवर इतरांचे त्याचदिवशी स्वॅब घेण्याच्या सूचना, अशा दुहेरी कात्रीत हे अधिकारी अडकले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिल महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत निघाले आहेत. गेल्या काही दिवसात सातशेपासून ते बाराशेपर्यंत नवे रुग्ण नोंदविण्यात येत आहेत. मृतांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. हातकणंगले, करवीर, आजरा, शिरोळ तालुक्यात तर ही संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळेच आता वाहतुकीच्या समस्येला या अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

उदाहरणच द्यायचे झाल्यास, ३० एप्रिलला आजरा तालुक्यात ११७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या सर्वांना कोरोना उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली. जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिका, ‘१०८’ रुग्णवाहिका, तालुक्यातील काही ट्रस्ट, आजरा नगरपंचायतीची रुग्णवाहिका यातून हे रुग्ण आणण्यात आले. अशीच् अवस्था प्रत्येक तालुक्यात आहे. दर दिवशी प्रत्येक तालुक्याची रुग्णसंख्या वेगवेगळी असल्यामुळे त्यानुसार या सर्वांना उपचार केंद्रापर्यंत आणण्यासाठी या अधिकाऱ्यांना तसेच ग्रामसेवकांना जोडण्या घालाव्या लागत आहेत.

एकदा का या पाॅझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल केले की, या सर्वांना त्यांच्या जवळच्या संपर्कात असलेल्यांना त्याच दिवशी स्वॅबसाठी नेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. परंतु त्यांना गावातून स्वॅब देण्यासाठी न्यायचे कशातून, याबाबत मात्र स्पष्ट सूचना नाहीत. यासाठी लागणाऱ्या वाहनाचा खर्च कशातून करायचा, असा प्रश्न या अधिकाऱ्यांसमोर आहे. अनेक तालुक्यांतील जवळच्या संपर्कातील व्यक्तींचे याच कारणासाठी अजूनही स्वॅब दिले गेलेले नाहीत. अनेक ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यासाठी ४० ते ५० किलोमीटरवर मोटारसायकलने जावा, म्हणून सांगण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. जर त्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली नाही, तर यातील काहीजण स्वॅब देण्यासाठी जाण्यास टाळाटाळही करत आहेत. काही ठिकाणी जुन्या रुग्णवाहिका आहेत, मात्र तेथे चालक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट

गावातील वाहनही मिळताना अडचणी

पॉझिटिव्ह रुग्ण किंवा संंपर्कातील ग्रामस्थांना स्वॅबसाठी नेताना गावातील वाहन मागितल्यानंतर, तेही अनेक ठिकाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पैसे देताे, असे सांगूनही अनेकजण तयार होत नाहीत. या वाहनांचे सॅनिटायझेशन, चालकाला पीपीई कीट कोण देणार, असेही प्रश्न आहेत.

चौकट

हा आहे पर्याय...

जिल्ह्यात अनेक शासकीय आणि निमशासकीय विभागांची वाहने चालकांसह वापरात आहेत. मात्र कोरोनामुळे अनेक विभागांच्या कामकाजावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ज्या विभागांकडील अशी वाहने उपलब्ध होऊ शकतात, ती वाहने चालकासह प्रत्येक तालुक्याला उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ज्या पध्दतीने निवडणूक काळात वाहनांचे नियोजन केले जाते, तसे नियोजन आवश्यक आहे.