शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बेमुमार वृक्षतोडीने वन्यप्राणी लोकवस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

पन्हाळा परिसरात बिबट्याचा खुलेआम वावर लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : विक्रम पाटील पन्हाळा : शाहूवाडी तालुक्याचा बहुतांश भाग हा ...

पन्हाळा परिसरात बिबट्याचा खुलेआम वावर

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : विक्रम पाटील

पन्हाळा : शाहूवाडी तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ असल्यामुळे या परिसरात बिबट्यासह जंगली प्राण्यांचा शिरकाव शेती शिवारासह लोकवस्तीमध्ये वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. गव्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. लोकवस्तीत जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने डोंगर परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकामे करताना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे.

वन्यप्राणी डोंगरदऱ्या सोडून लोकवस्तीत खुलेआम शिरकाव करत आहेत, हा एक चिंतनाचा विषय बनला आहे. पन्हाळा शाहूवाडी परिसर घनदाट जंगल व झाडाझुडपांचा परिसर म्हणून ओळखला जात होता. परंतु, दिवसेंदिवस बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगले रिकामी होत चालली असून, डोंगर परिसर भकास झाला आहे. वन अधिकाऱ्यांचा कृपाशिर्वाद व दुर्लक्षामुळे जंगली प्राण्यांची शिकार दिवसागणिक वाढत असल्याने जंगली प्राण्यांची अन्नसाखळी तुटत चालली आहे. बिबट्यासारख्या प्राण्याला पोट भरण्यासाठी डोंगरभागात शिकार सापडत नसल्यामुळे तो लोकवस्तीत शिरकाव करत आहे.

फोटो किंवा सर्कशीमध्ये पाहायला मिळणारे वन्यप्राणी आता प्रत्यक्षात लोकांच्या समोर येऊ लागले आहेत. लोकांच्या हेटाळणीमुळे कळपातील गवा रेड्यासारखे प्राणी बिथरून हिंस्र बनत लोकांवर थेट जीवघेणा हल्ला करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गव्यांचे प्रमाण बाजारभोगाव - काळजवडे या परिसरात जास्त असल्याने जांभाळी - कासारी खोरा भीतीच्या छायेखाली वावरत आहे. मुख्य रस्त्यावरून रात्रीचा प्रवास करणेदेखील अनेकजण टाळत आहेत.

वन विभागाचे अधिकारी मात्र शासकीय योजनांचा कागदी घोडा नाचवून कारवाईचा दिखावा करत असल्याने दिसते. लोकांमधून वन विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. शतकोटी योजनेच्या नावाखाली लावलेली झाडे संपुष्टात आली असून, वनतळ्यांचे फक्त अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तर वन्यप्राणी शेती शिवारात येऊ लागल्याने पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान होऊनदेखील तुटपुंज्या मदतीची बोळवण करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.