शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या हिंसाचारामुळे वाढती वैफल्यग्रस्तता : मानसोपचार तज्ज्ञांचे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:28 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून ...

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील घटनेमागील कारणांचा शोध

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.

धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना समूहाने अत्यंत क्रूरपणे ठेचून मारले. कुण्याही संवेदनशील माणसाच्या अंंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. एवढ्या मोठ्या समूहामध्ये ते लोक कोण आहेत, याची कोणतीच चौकशी करावी किंवा त्यांना पोलीस येईपर्यंत हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवावे व त्यानंतर त्यांचा न्याय करावा असे का वाटले नसेल, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात दाटले. एक समाज म्हणून आपण नक्की कोणत्या दिशेने निघालो आहोत याबद्दलही मनात भीतीचे काहूर उमटले.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे एका मुलाखतीत म्हटले होते, की मला आज अशी भीती वाटते की येणाऱ्या काळात लोक दिवसाढवळ्या लोकांचे खून पाडतील एवढी अस्वस्थता समाजात साचली आहे. त्यांची भीती सत्यात उतरायला फार वेळ लागलेला नाही. लोक कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून दिवसाढवळ्या लोकांचे मुडदे पाडू लागले आहेत.

याच घटनेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांच्याशी संवाद साधला व सामूहिक हिंसेच्या घटनेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला.डॉ. चौगले म्हणाले, ‘समाजात बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनांत ताण आहे. मग हा ताण किंवा चीड अशा सामूहिक घटनांतून व्यक्त होत आहे का अशी शंका वाटावी, अशी स्थिती आहे. अशा हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही. आपल्या पुढचा माणूस दगड मारत आहे किंवा लाथ मारत आहे म्हटल्यावर तोदेखील पुढे होऊन त्यामध्ये सहभागी होत आहे. बºयाचदा मारणाºयाला हे माहीत नसते की, आपण कुणाला कशासाठी मारत आहोत. कारण समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.’

सामाजिक हिंसाचारच वाढला असे नसून आपल्या घरातील हिंसाचारही वाढला आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता, समजूतदारपणा किंवा संयम कमी झाला आहे असे सांगून डॉ. चौगले म्हणाले, ‘मग अशा घटनांतून निर्माण होणारा राग व्यक्त करण्यासाठी एखादे असे सामाजिक हिंसेचे आऊटलेट मिळाले की समाज बेभान होत आहे. पूर्वी समाजाला चार-दोन गोष्टींबद्दल तरी किमान आदर असायचा. आता तो कमी झाला आहे. डॉक्टरांवरील अलीकडील काळात वाढलेले हल्ले हे त्याचेच द्योतक आहे.

हा समाज जसा डॉक्टरांवर अविश्वास दाखवीत आहे तसाच तो राजकीय व्यवस्थेबद्दलही, पोलीस यंत्रणेबद्दलही दाखवीत आहे. प्रत्येक पेशामध्ये जसे वाईट आहे, तसे थोडे कमी असले तरी चांगलेही आहे. यावरील समाजाचा विश्वास उडत चालला आहे हा माझ्या मते आजच्या आणि उद्याच्या समाजासमोरीलही मोठा धोका व चिंतेची बाब आहे.’ही आहेत महत्त्वाची कारणेधुळ््यात मुले पळवणारी टोळी असल्याचा संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना मारताना समाजाची संवेदनशीलता हरवलीसहनशीलता, समजूतदारपणा, संयम कमी झाल्याने छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्या करत आहेत.सामूहिक हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही.समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनात ताण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा