शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वाढत्या हिंसाचारामुळे वाढती वैफल्यग्रस्तता : मानसोपचार तज्ज्ञांचे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:28 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून ...

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील घटनेमागील कारणांचा शोध

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.

धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना समूहाने अत्यंत क्रूरपणे ठेचून मारले. कुण्याही संवेदनशील माणसाच्या अंंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. एवढ्या मोठ्या समूहामध्ये ते लोक कोण आहेत, याची कोणतीच चौकशी करावी किंवा त्यांना पोलीस येईपर्यंत हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवावे व त्यानंतर त्यांचा न्याय करावा असे का वाटले नसेल, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात दाटले. एक समाज म्हणून आपण नक्की कोणत्या दिशेने निघालो आहोत याबद्दलही मनात भीतीचे काहूर उमटले.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे एका मुलाखतीत म्हटले होते, की मला आज अशी भीती वाटते की येणाऱ्या काळात लोक दिवसाढवळ्या लोकांचे खून पाडतील एवढी अस्वस्थता समाजात साचली आहे. त्यांची भीती सत्यात उतरायला फार वेळ लागलेला नाही. लोक कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून दिवसाढवळ्या लोकांचे मुडदे पाडू लागले आहेत.

याच घटनेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांच्याशी संवाद साधला व सामूहिक हिंसेच्या घटनेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला.डॉ. चौगले म्हणाले, ‘समाजात बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनांत ताण आहे. मग हा ताण किंवा चीड अशा सामूहिक घटनांतून व्यक्त होत आहे का अशी शंका वाटावी, अशी स्थिती आहे. अशा हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही. आपल्या पुढचा माणूस दगड मारत आहे किंवा लाथ मारत आहे म्हटल्यावर तोदेखील पुढे होऊन त्यामध्ये सहभागी होत आहे. बºयाचदा मारणाºयाला हे माहीत नसते की, आपण कुणाला कशासाठी मारत आहोत. कारण समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.’

सामाजिक हिंसाचारच वाढला असे नसून आपल्या घरातील हिंसाचारही वाढला आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता, समजूतदारपणा किंवा संयम कमी झाला आहे असे सांगून डॉ. चौगले म्हणाले, ‘मग अशा घटनांतून निर्माण होणारा राग व्यक्त करण्यासाठी एखादे असे सामाजिक हिंसेचे आऊटलेट मिळाले की समाज बेभान होत आहे. पूर्वी समाजाला चार-दोन गोष्टींबद्दल तरी किमान आदर असायचा. आता तो कमी झाला आहे. डॉक्टरांवरील अलीकडील काळात वाढलेले हल्ले हे त्याचेच द्योतक आहे.

हा समाज जसा डॉक्टरांवर अविश्वास दाखवीत आहे तसाच तो राजकीय व्यवस्थेबद्दलही, पोलीस यंत्रणेबद्दलही दाखवीत आहे. प्रत्येक पेशामध्ये जसे वाईट आहे, तसे थोडे कमी असले तरी चांगलेही आहे. यावरील समाजाचा विश्वास उडत चालला आहे हा माझ्या मते आजच्या आणि उद्याच्या समाजासमोरीलही मोठा धोका व चिंतेची बाब आहे.’ही आहेत महत्त्वाची कारणेधुळ््यात मुले पळवणारी टोळी असल्याचा संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना मारताना समाजाची संवेदनशीलता हरवलीसहनशीलता, समजूतदारपणा, संयम कमी झाल्याने छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्या करत आहेत.सामूहिक हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही.समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनात ताण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा