शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

वाढत्या हिंसाचारामुळे वाढती वैफल्यग्रस्तता : मानसोपचार तज्ज्ञांचे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:28 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून ...

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील घटनेमागील कारणांचा शोध

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.

धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना समूहाने अत्यंत क्रूरपणे ठेचून मारले. कुण्याही संवेदनशील माणसाच्या अंंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. एवढ्या मोठ्या समूहामध्ये ते लोक कोण आहेत, याची कोणतीच चौकशी करावी किंवा त्यांना पोलीस येईपर्यंत हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवावे व त्यानंतर त्यांचा न्याय करावा असे का वाटले नसेल, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात दाटले. एक समाज म्हणून आपण नक्की कोणत्या दिशेने निघालो आहोत याबद्दलही मनात भीतीचे काहूर उमटले.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे एका मुलाखतीत म्हटले होते, की मला आज अशी भीती वाटते की येणाऱ्या काळात लोक दिवसाढवळ्या लोकांचे खून पाडतील एवढी अस्वस्थता समाजात साचली आहे. त्यांची भीती सत्यात उतरायला फार वेळ लागलेला नाही. लोक कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून दिवसाढवळ्या लोकांचे मुडदे पाडू लागले आहेत.

याच घटनेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांच्याशी संवाद साधला व सामूहिक हिंसेच्या घटनेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला.डॉ. चौगले म्हणाले, ‘समाजात बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनांत ताण आहे. मग हा ताण किंवा चीड अशा सामूहिक घटनांतून व्यक्त होत आहे का अशी शंका वाटावी, अशी स्थिती आहे. अशा हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही. आपल्या पुढचा माणूस दगड मारत आहे किंवा लाथ मारत आहे म्हटल्यावर तोदेखील पुढे होऊन त्यामध्ये सहभागी होत आहे. बºयाचदा मारणाºयाला हे माहीत नसते की, आपण कुणाला कशासाठी मारत आहोत. कारण समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.’

सामाजिक हिंसाचारच वाढला असे नसून आपल्या घरातील हिंसाचारही वाढला आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता, समजूतदारपणा किंवा संयम कमी झाला आहे असे सांगून डॉ. चौगले म्हणाले, ‘मग अशा घटनांतून निर्माण होणारा राग व्यक्त करण्यासाठी एखादे असे सामाजिक हिंसेचे आऊटलेट मिळाले की समाज बेभान होत आहे. पूर्वी समाजाला चार-दोन गोष्टींबद्दल तरी किमान आदर असायचा. आता तो कमी झाला आहे. डॉक्टरांवरील अलीकडील काळात वाढलेले हल्ले हे त्याचेच द्योतक आहे.

हा समाज जसा डॉक्टरांवर अविश्वास दाखवीत आहे तसाच तो राजकीय व्यवस्थेबद्दलही, पोलीस यंत्रणेबद्दलही दाखवीत आहे. प्रत्येक पेशामध्ये जसे वाईट आहे, तसे थोडे कमी असले तरी चांगलेही आहे. यावरील समाजाचा विश्वास उडत चालला आहे हा माझ्या मते आजच्या आणि उद्याच्या समाजासमोरीलही मोठा धोका व चिंतेची बाब आहे.’ही आहेत महत्त्वाची कारणेधुळ््यात मुले पळवणारी टोळी असल्याचा संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना मारताना समाजाची संवेदनशीलता हरवलीसहनशीलता, समजूतदारपणा, संयम कमी झाल्याने छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्या करत आहेत.सामूहिक हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही.समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनात ताण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा