शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

(सुधारीत )ऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

कोल्हापूर : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या ...

कोल्हापूर : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या रात्री अचानक पावसाने एन्ट्री केली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या या पावसाने संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत टप्प्याटप्याने हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत सर्वांचीच तारांबळ उडवली.

हवामान खात्याने १७ ते १८ रोजी विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो बुधवारी कोल्हापुरात तंतोतंत खरा ठरला. सोमवारपासून जिल्ह्यात दाट धुके पडत आहे. दवही जास्त असल्याने पहाटे झाडावरून पाण्याचे थेंबही पडत आहेत. सकाळी गारवा आणि दिवसभर कडक उन्हाचे चटकेही बसत आहेत. बुधवारी सकाळीही असेच धुके होते, त्यानंतर कडक ऊन पडले. दुपारी दोननंतर मात्र वातावरण अचानक ढगाळ झाले. गार वारेही जोरात वाहू लागले. संध्याकाळी गडहिंग्लज, आजरा परिसरात पावसाने हजेरीही लावली. रात्री दहानंतर पुन्हा विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर परिसरात दीडच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दरम्यान, गुरुवारीही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. सकाळी ढगाळ वातावरण दिसत होते. दहानंतर ते निवळले, गारवा कमी होऊन उष्माही वाढला, पण दुपारी दोननंतर पुन्हा आभाळ भरुन आले आणि पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत राहील आणि त्यानंतर शुक्रवारी वातावरण पूणपणे निवळेल, असा हवामान खात्याने सांगितले आहे.

चौकट ०१

पावसाचा फटका पिकांना

ऐनवेळेला आलेल्या पावसाने मात्र सर्वांचीच तारांबळ उडवली. रात्रीच पाऊस सुरू झाल्याने गुऱ्हाळासाठी वाळवलेले जळणही भिजले. पावसाचा फारसा जोर नसल्याने उसाच्या तोडीवर परिणाम झाला नाही. या पावसाने फळ पिकांना मात्र फटका बसला आहे. अजूनही आंब्याला मोहोर येण्याची, कैऱ्या धरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विचित्र हवामानामुळे ते गळून पडणार आहे. फणस, काजूचीही गळ वाढणार आहे. सध्या भुईमूग फुलोऱ्यात, तर कुठे उगवणीनंतर वाढीच्या अवस्थेत आहे. धुके व पावसामुळे त्यावर तांबेरा, करप्याचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्याने आता फवारणीसाठी खर्च करावा लागणार आहे.