शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

(सुधारीत )ऐनवेळच्या पावसाने जागवली रात्र, दुपारी उडवली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

कोल्हापूर : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या ...

कोल्हापूर : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळसदृश हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम होऊन निरभ्र आभाळ आणि कोरडे हवामान असतानाही बुधवारच्या रात्री अचानक पावसाने एन्ट्री केली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या या पावसाने संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत टप्प्याटप्याने हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत सर्वांचीच तारांबळ उडवली.

हवामान खात्याने १७ ते १८ रोजी विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो बुधवारी कोल्हापुरात तंतोतंत खरा ठरला. सोमवारपासून जिल्ह्यात दाट धुके पडत आहे. दवही जास्त असल्याने पहाटे झाडावरून पाण्याचे थेंबही पडत आहेत. सकाळी गारवा आणि दिवसभर कडक उन्हाचे चटकेही बसत आहेत. बुधवारी सकाळीही असेच धुके होते, त्यानंतर कडक ऊन पडले. दुपारी दोननंतर मात्र वातावरण अचानक ढगाळ झाले. गार वारेही जोरात वाहू लागले. संध्याकाळी गडहिंग्लज, आजरा परिसरात पावसाने हजेरीही लावली. रात्री दहानंतर पुन्हा विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर परिसरात दीडच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दरम्यान, गुरुवारीही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. सकाळी ढगाळ वातावरण दिसत होते. दहानंतर ते निवळले, गारवा कमी होऊन उष्माही वाढला, पण दुपारी दोननंतर पुन्हा आभाळ भरुन आले आणि पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत राहील आणि त्यानंतर शुक्रवारी वातावरण पूणपणे निवळेल, असा हवामान खात्याने सांगितले आहे.

चौकट ०१

पावसाचा फटका पिकांना

ऐनवेळेला आलेल्या पावसाने मात्र सर्वांचीच तारांबळ उडवली. रात्रीच पाऊस सुरू झाल्याने गुऱ्हाळासाठी वाळवलेले जळणही भिजले. पावसाचा फारसा जोर नसल्याने उसाच्या तोडीवर परिणाम झाला नाही. या पावसाने फळ पिकांना मात्र फटका बसला आहे. अजूनही आंब्याला मोहोर येण्याची, कैऱ्या धरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विचित्र हवामानामुळे ते गळून पडणार आहे. फणस, काजूचीही गळ वाढणार आहे. सध्या भुईमूग फुलोऱ्यात, तर कुठे उगवणीनंतर वाढीच्या अवस्थेत आहे. धुके व पावसामुळे त्यावर तांबेरा, करप्याचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्याने आता फवारणीसाठी खर्च करावा लागणार आहे.