शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोणी वाईट बोललं तर जागेवर विसरा, आनंदाने जगा; ह..भ प. इंदोरीकर महाराज यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:44 IST

कोल्हापुरात कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राउंडवर रंगला किर्तन सोहळा

कसबा बावडा: आपल्याबद्दल काय घडलं, कोणी वाईट बोललं तर जाग्यावर विसरा आणि आनंदाने जगा. असा सल्ला ह. भ. प. निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी येथे दिला. आपलं शरीर जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. शरीरावर अन्याय झाला की रोग होतो. त्यामुळे आपल्या शरीरावर प्रेम करा. शरीर चांगलं सांभाळा असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. येथील पॅव्हिलियन ग्राउंडवर शुक्रवारी सायंकाळी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून हा सल्ला दिला. डी. वाय. पाटील ग्रुप, श्रीराम विकास सेवा संस्था,  तुकाराम महाराज मंडप, ज्ञानेश्वर महाराज मंडप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, शांतादेवी डी पाटील, श्रीराम संस्थेचे सभापती संतोष पाटील ,उपसभापती अनंत पाटील आदी  उपस्थित होते. कीर्तनाला प्रचंड गर्दी झाली होती.इंदोरीकर महाराज म्हणाले, शरीराकडे दुर्लक्ष करून संपत्ती मिळवण्याच्या मागे अनेक जण लागतात. पण अती संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी बनवण्या सारखं आहे. तुमच्या  अंगातील ताकद आणि खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपला.  शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. हे लक्षात ठेवा आणि शरीराला सांभाळा. ८० टक्के लोकांनी शरीरावर अन्याय केलाय. म्हणून लोक आजारी पडतात.आजच्या कलियुगात माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. असे सांगून इंदोरीकर महाराज म्हणाले कोणावरही अन्याय करू नका. नम्रता ठेवा. चांगले कर्म करत रहा. कर्म हाच देव आहे. तुमच्याकडे भरपूर संपत्ती आली तर तुम्हाला कोणाची दया येणार नाही, आणि दया आली तर संपत्ती येणार नाही.मात्र जर या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आल्या तर मात्र तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अति पैशामुळे जर तुम्हाला घमेंड आली तर तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. रागावर नियंत्रण ठेवा. दोन मिनिटांचा राग तुमचे जिंदगी संपू शकतो. डी वाय पाटील घराण्याबद्दल बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले, या आदर्श गावाला पाटील नावाचे नेतृत्व लाभलं आहे. संकटाच्या छातीवर पाय ठेवून पुढे गेलेले हे घराणं आहे. आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. दरम्यान किर्तनासाठी उत्तम दर्जाची साऊंड सिस्टिम, उत्कृष्ट लाईट, भव्य स्टेज उभारण्यात आले होते. कीर्तनासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतून लोक आल्याने पॅव्हेलियन ग्राउंडवर प्रचंड गर्दी झाली होती. महिलांची संख्या ही लक्षणीय होती.मुलांचा मोबाईल बंद ठेवा..इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात ४० टक्के मुलं मोबाईलवर रमी खेळून भिकारी झाले असल्याचे सांगून हा मोबाईल  शाळेत बंद ठेवण्यासाठी आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन करावे अशी सूचना केली. यावर आमदारांनी येत्या जून पासून या सूचनांची जनजागृती करून अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरindurikar maharajइंदुरीकर महाराज