शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या प्रश्नांचा केंद्राकडे पाठपुरावा करू

By admin | Updated: June 5, 2016 01:05 IST

रामविलास पासवान यांची ग्वाही : सरकारचे काम तळागाळापर्यंत पोहोचवा; भाजप-लोकजनशक्ती पक्षाचा मेळावा

कोल्हापूर : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्य लोकांसाठी विविध योजना राबवून खऱ्या अर्थाने विकासाला चालना दिली आहे. केंद्र सरकारचे काम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी केले. कोल्हापूरची विमानसेवा, पासपोर्ट कार्यालय, सर्किट बेंच, आदी प्रश्नांबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. भाजप व लोकजनशक्ती पक्षांच्या कार्यकर्त्यांचा केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर ज्यांनी ६० वर्षे राज्य केले त्या कॉँग्रेसनेच आंबेडकरांना अपमानित केल्याचा आरोप करत मंत्री पासवान म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे देशभरात पसरलेले वारे कमी होईल, याची भीती होती. पण, आक्रमक कामाने मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. पाच दिवसांत पाच देशांचा दौरा करण्याचे काम केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात. मोदी म्हणजे काम आणि काम म्हणजे मोदी, अशी प्रतिमा जनतेमध्ये झाली आहे. ‘पंतप्रधान सडक योजना’, ‘शेतकरी विमा योजना’ यांसह विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला आधार दिलाच, त्याचबरोबर ज्या कॉँग्रेसने ६0 वर्षे आंबेडकरांना अपमानित केले, त्या आंबेडकरांना केंद्रातील भाजप सरकारने खऱ्या अर्थाने गौरवित केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार भूपेंद्र यादव, केंद्रीय लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह, महेश जाधव, आमदार अमल महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी बाबा देसाई, संभाजी जाधव, बाबासाहेब भोसले, भगवान काटे, सत्यजित कदम, उत्तम कांबळे, रवी गुरूड, आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.