शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! ’ राजू शेट्टी यांचे ट्विट : वेगळ्या राजकीय वाटेने जाण्याचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा होगा!' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेचे ठरले आहे. भाजपची संगत सोडली. आता महाविकास आघाडीतूनही बाहेर पडून ‘एकला चलो रे’चा मार्ग ते निवडतात की काय, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनता काय कौल देते, ते पाहून पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

भाजपला विरोध म्हणून त्यांनी महाविकास आघाडीशी संगत केली; परंतु त्या सरकारकडूनही लोकांच्या प्रश्र्नांना न्याय देण्याची भूमिका दिसत नसल्याचा अनुभव येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला. आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेट्टी यांचे राजकारणही सार्वजनिक चारित्र्य जपणारे आहे. त्यामुळे ज्या आघाडीला आपण पाठिंबा दिला, त्यांच्या कृत्यांची घाण आपल्या अंगावर उडू नये, अशाही भावना संघटनेतून व्यक्त होत आहेत.

शेट्टी म्हणाले, लोकसभेमध्ये झालेला पराभव सर्वांनाच धक्कादायक होता. पराभवानंतर राज्यभर फिरून लोकांच्या भावना समजून घेतल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना सामान्यांचे प्रश्न घेऊन लढणारी संघटना आहे. सामान्यांच्या प्रश्नांचे भांडवल करण्यात विरोधी पक्षाला रस आहे. मात्र मूलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी रस नाही. सातबारा कोरा केल्याशिवाय अमक्याची अवलाद नाही, अशा गप्पा ठोकल्या जातात. पेट्रोल, डिझेल, गॅसची महागाई प्रचंड वाढली आहे. याबद्दल महाविकास आघाडीला काही सोयरसुतक नाही. दिल्लीमध्ये शेतकरी कायद्याविरोधात गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचेही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काही देणेघेणे नाही. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल माफ करण्याचे सूतोवाच केले. मात्र, सध्या वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा फटका दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना बसत आहे. याचे काहीच गांभीर्य महाविकास आघाडी सरकारला नाही.

२२ जवान मारले त्याबद्दल बोला...

राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. शेतकऱ्यांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठे दिसत नाहीत. भाजपला कंगना राणावत, सुशांत राजपूत, अर्णब गोस्वामी या विषयांत रस आहे. अंबानी यांच्या घरासमोरील जिलेटिन कांड्यांचा स्फोट होणार नाही, हे माहीत असूनही चर्चा सुरू आहे. नक्षलवाद्यांनी २२ जवान मारले त्याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही, अशी नाराजी शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.