शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळ्यातील वाद, गोकुळमधील संघर्ष वाढवणार, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा : मुश्रीफ यांनाही केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घरफाळा व अन्य प्रकरणांवरून गैरव्यवहाराचे आरोप केल्याने गोकूळमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

हॉटेलच्या घरफाळ्याचा विषय यापूर्वीही दोन निवडणुकीवेळी उपस्थित झाला आहे. त्यावेळीही त्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली. ऐन विधानसभा निवडणुकीत तोंडावर मतदान असताना त्याबाबत आरोप झाले; परंतु तरीही निवडणुकीचा निकाल अपेक्षित असाच लागला. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. ती वेळेत होते की लांबणीवर पडते हे निश्चित नाही, असे असताना आरोपांचा बार आताच उडवून द्यायची गरज नव्हती. ऐन निवडणुकीच्या काळात पुराव्यानिशी आरोप झाले असते तर त्याचा जनमाणसावर काही प्रमाणात परिणाम झाला असता. कारण निवडणूकही महापालिकेची आणि आरोपही त्याच संस्थेच्या कारभाराबद्दल झाल्याने त्यातील गांभीर्य वाढले असते. आताच हे आरोप होण्यामागे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या चिरंजीवाच्या पुण्यात झालेल्या लग्न समारंभात गर्दी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे निमित्त घडले असल्याचे दिसते. हा गुन्हा गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांच्यामुळेच दाखल झाला, असे महाडिक गटाला वाटते. त्यामुळे ते लग्न करून कोल्हापुरात आल्यावर तातडीने महाडिक यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन घरफाळ्याचे आरोप केले. यापूर्वीचे आरोप कदम बंधूंनी केले होते; परंतु यावेळेला मैदानात थेट माजी खासदार महाडिकच उतरल्याने त्याचे गांभीर्य वाढले.

मुश्रीफ यांची खपली...

पालकमंत्र्यांसोबत आता ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावरही काही आरोप झाले आहेत. एक गंभीर आरोप तर पत्रकार परिषदेत केला व नंतर तो मागे घेण्यात आला; परंतु त्याची जाहीर चर्चा व्हायची ती झालीच. महापालिकेच्या आधी गोकुळ दूध संघाची लढाई होणार आहे. त्यात मुश्रीफ यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. अशा स्थितीत त्यांची खपली काढण्याची गरज नव्हती. अशा आरोप-प्रत्यारोपातून निष्पण्ण काही होत नाही. कारण त्याचा नंतर पाठपुरावा होत नाही. कदम बंधू यांनीच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी केलेले आरोप नंतर ते विसरले आता पुन्हा निवडणूक आल्यावरच त्यांना ते आठवले. त्यामुळे त्यातून काही हाती लागण्यापेक्षा राजकीय संघर्ष वाढणार एवढे मात्र नक्की.