शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदावरच सत्तेचा ‘लंबक’ अवलंबून !

By admin | Updated: November 5, 2016 01:00 IST

गडहिंग्लज नगरपालिका : नगराध्यक्षाचा सामना तिरंगी होण्याची शक्यता

राम मगदूम -- गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमत कुणाचे होणार हे नगराध्यक्षपदाच्या निकालावरच अवलंबून आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या ‘सामन्या’कडेच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ‘सत्तेचा लंबक’ अवलंबून असणारा हा सामना तिरंगी होईल, असेच आजचे चित्र आहे. मात्र, प्रत्यक्ष लढतीसाठी माघारीची वाट पहावी लागणार आहे.सत्ताधारी जनता दलाने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या वसंत यमगेकरांना भाजपने उमेदवारी दिली तर भाजपमधून आलेल्या रमेश रिंगणेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँगे्रसतर्फे सागर हिरेमठ, शिवसेनेतर्फे प्रा. सुनील शिंत्रे तर ‘स्वाभिमानी’कडून अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल झाले असले तरी हा सामना ‘तिरंगी’च होईल असे प्राथमिक चित्र आहे.गेल्या चार दशकातील तीन निवडणुकांचा अपवाद वगळता पालिकेवर जनता आघाडीचीच सत्ता राहिली आहे. अपवादाने सत्तांतर घडले त्यावेळच्या अनुक्रमे राजर्षी शाहू आघाडी व महालक्ष्मी आघाडीचे नेतृत्व दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्याकडे होते. गतवेळच्या राष्ट्रवादी-शहापूरकर गट आघाडीचे नेतृत्व कुपेकर व मुश्रीफ यांनी केले. त्यामुळे जनता दलापाठोपाठ राष्ट्रवादीचा शहरात प्रभाव आहे. जनता दल व राष्ट्रवादीच्या प्रभावाला छेद देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.भाजपच्या नेतृत्वाखालील संभाव्य महाआघाडीत शिवेसना व स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होण्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्यातील जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही आघाडी अद्याप चर्चेतच अडकली आहे.दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना गडहिंग्लज शहरात मिळालेली लक्षणीय मते विचारात घेवून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्याला मिळावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांनी ही मागणी नेटाने लावून धरल्यास फेरबदल होवू शकतो. मात्र, रिंगणेसारखा कार्यकर्ता गमावल्यानंतर यमगेकरांना बाजूला करून भाजप धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच नगराध्यक्षपदाचा सामना तिरंगीच होईल असे स्पष्टपणे दिसत आहे. यात बाजी मारणाऱ्यांचेच यावेळी पालिकेत बहुमत राहील, असे जाणकारांचे मत आहे.१९७४ ची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक काँगे्रसचे डॉ. एस. एस. घाळी व विरोधी आघाडीचे आप्पासाहेब नलवडे यांच्यात झाली. त्यात मोठ्या मताधिक्क्याने घाळी विजयी झाले. मात्र, २१ पैकी विरोधी आघाडीला १४ तर सत्ताधाऱ्यांना ७ जागा मिळाल्या होत्या. २००१ ची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादीच्या निरूपमा बन्ने व जनता दलाच्या चंद्रकला पाटणे यांच्यात झाली. त्यात बन्ने विजयी झाल्या. त्यावेळी विरोधी राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना व भाजप युतीच्या महालक्ष्मी आघाडीला १७ तर सत्ताधारी जनता आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या.