शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

शिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा!,शिक्षण विभागाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 12:02 PM

कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी 'शिक्षक मित्र' यांनी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षणापासून दुर गेलेली मुलं पुन्हा प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे.

ठळक मुद्देशिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा!,शिक्षण विभागाचा उपक्रम३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईलच नाहीत; समुपदेशक सरसावले

सातारा : कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी 'शिक्षक मित्र' यांनी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षणापासून दुर गेलेली मुलं पुन्हा प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे.कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. मात्र, ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. यामध्ये व्हर्च्युअल क्लास, व्हिडिओ द्वारे तसेच दुरदर्शनवरील टिलीमिली कार्यक्रम, गुगल क्लासरूम यांचा समावेश आहे.

युट्यूब चॅनेल, जियो चॅनल, दिक्षा  अँपसह अन्य शैक्षणिक  अँपद्वारे शिक्षण दिले जात आहे. जिल्हयातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. अनेकांकडे साधे फोन आहेत. स्मार्ट फोन किंवा साधे फोन नसणारे विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून दूर राहण्याची शक्यता आहे.

डोंगरी भागात रेंजची समस्या आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य उपाय योजना करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शिक्षक मित्र आणि समुपदेशन याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा पर्याय शिक्षण विभागाने काढला.सुविधा नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नैराश्य येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी फोनद्वारे समुपदशेन करणे सुरू आहे. स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर त्यालाही सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला.

जिल्ह्यात व्यवसाय मार्गदर्शनासाठी २० समुपदेशक नियुक्त आहेत. कोविड १९ बाबत तसेच ताणतणावाबाबत त्यांचे समुपदेशन घेण्यास विद्यार्थी, पालकांना प्रवृत्त करावे. व्हर्च्युअल क्लासमध्ये समुपदेशकांना लिंक देऊन जॉईन केल्यावर थेट विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क होऊ शकेल त्या दृष्टीने समुपदेशकांच्या संपर्कात राहून योग्य ती कार्यवाही करावी, असे सुचित करण्यात आले आहे.अशी आहे शिक्षक मित्र संकल्पनागावातील डी. एड., बी. एड. किंवा पदवीधर तरूण-तरूणी यांना स्वंयप्रेरणेने विना मोबदला मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करून त्य ाविद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणावे. यामध्ये कुठल्याही प्रकारे विद्यार्थी ताण घेणार नाहीत, अशा आनंददायी पध्दतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे.

विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांचे समाधान पालकांकडून होणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे शिक्षक मित्र आणि समुपदेशन या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे. याचा लाभही विद्यार्थ्यांकडून घेतला जात आहे.- राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSatara areaसातारा परिसर