शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’च्या अद्ययावत उपकेंद्रासाठी सरकारने आणखी जागा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे असलेल्या सारथी संस्थेसाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ...

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे असलेल्या सारथी संस्थेसाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीचे पहिले उपकेंद्र कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २ एकर जागा दिल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे कौतुकच आहे. पण अद्ययावत उपकेंद्रासाठी आणखी जागा द्यावी, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी व्यक्त केली.

कसबा बावड्यातील 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, सारथीचे पहिले उपकेंद्र कोल्हापुरात व्हावे, यासाठी आग्रही होतो. यानुसार शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू होत आहे. हे केंद्र अद्ययावत होणे आवश्यक आहे. यासाठी सध्या दिलेली २ एकर जागा अपुरी पडते. यामुळे आवश्यकतेनुसार ५ एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन सरकारने द्यावी. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ साली मराठा, ओबीसी, अनुसूचित जातींसाठी देशात पहिल्यांदा आरक्षण दिले. या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने समतेचा संदेश दिला. हा संदेश घेऊनच आम्ही पुढे जात आहोत.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडी सरकार येथे सारथीचे उपकेंद्र सुरू केले. राज्य सरकार ५ आणि ६ जुलैला पावसाळी अधिवेशन बोलवले आहे. यामध्ये मराठा आरक्षणसंबंधी चर्चा होईल. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यांनी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात आहे. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने घटनादुरूस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कमी कालावधीत समतेच्या राज्यासाठी प्रभावी असे काम केले. म्हणून राजर्षी शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालख्या आम्ही वाहत असतो. मराठा समाजाच्या मागणीनुसार सरकार येथे सारथीचे उपकेंद्र सुरू करत आहे. मराठा समाजास आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नसल्याने समाजाच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री पाटील आणि मी पुढाकार घेतला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन केल्यानंतर सरकार तातडीने सकारात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

भाजपने सहनशीलतेचा अंत पाहू नये

केंद्र सरकारने केलेल्या १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला राहिलेले नाहीत. यामुळे राज्याऐवजी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे आणि मराठा समाजास आरक्षण द्यावे, अशी विनंती पंतप्रधानांकडे करतो. भाजपने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.