शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

भाताला १४०० हमीभाव द्या : शेट्टी

By admin | Updated: November 10, 2014 00:47 IST

दुसरी भात परिषद : चारशेच्या बोनसचीही मागणी

बांबवडे : चालू हंगामात भाताला १३६० ते १४०० रुपयांचा हमीभाव व ४०० रुपये बोनस मिळावा, तसेच शेतकरी मागतील त्या ठिकाणी शासकीय भात खरेदी केंद्र उभारण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे दुसऱ्या भात परिषदेमध्ये ठरावाद्वारे केली.प्रारंभी सुरेश म्हासरकर यांनी स्वागत केले. विक्रम पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, पहिल्या भात परिषदेचा परिणाम म्हणजे केवळ सरकारच्या धोरणानुसार गेल्या वर्षी १३१० रु. हमीभाव व २०० रु. बोनस असा १५१० रु. प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. दुसऱ्या भात परिषदेमध्ये १३६० ते १४०० रु. हमीभाव व ४०० रु. बोनस तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, असे ठराव उद्याच्या अधिवेशनात ठेवून आमच्या ठरावाचे काय करताय, हे विचारणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.भातपिकाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शेती सोडून चाकरमाने म्हणून मुंबईला जावे लागते. त्यांच्या हाताला काम मिळायचे असेल तर विविध पिकांवर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योग येथेच उभा राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू, असेही शेट्टी म्हणाले. विधानसभेतील अपयशाबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणारे पराभूत होतात; मात्र शेतकऱ्यांसाठी चकार शब्दही न काढणारे विजयी होतात. ही मानसिकता लोकांनी आता बदलावी म्हणजे सत्तेसाठी दुकानदारी मांडणाऱ्या राजकारण्यांना चाप बसेल.प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द न बोलणाऱ्या नेत्यांवर टीका करताना, सर्व रोगांवर एखादा रामबाण उपाय असतो, तसे कापूस, भात, कांदा, ऊस असो की शाहूवाडीतील बॉक्साईट असो, सर्वांना योग्य न्याय मिळायचा असेल तर राजू शेट्टी यांनी आंदोलन करून जेलमध्ये जावे. म्हणजे सर्व पिकांना आपोआप रास्त भाव मिळतो. मग असे असेल तर संघटनेचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवायची वेळ आल्यावर तुम्ही माघारी का असता, असा जाब विचारून, जर हे विधानसभेत गेले तर आमच्यासाठी कोण भांडणार, असा प्रश्न तुम्हाला पडत असला, तर निवडून दिले तरी आणि नाही दिले तरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी अमरसिंह पाटील, प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्यान्नावार, जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, वसंत पाटील, भगवान काटे, बाळासो कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्या शीला पाटील, सागर शंभूशेटे, तुकाराम खुटाळे, गोरक्ष पाटील, अनिल पाटील, बबन माने, जयसिंग पाटील, भीमराव पाटील, अमोल महाजन, आदी उपस्थित होते. कारखानदार अस्वस्थदरवर्षी संघटना आंदोलन करते, त्याचा फायदा कारखान्यांना होतो. सरकार अनुदान जाहीर करते. आता संघटना गप्प आहे आणि सरकार आपल्याला अनुदान देणार नाही म्हणून कारखानदार अस्वस्थ झाले आहेत, परंतु आमची मागणी मान्य न झाल्यास येत्या २५ तारखेला पुणे साखर आयुक्तालयावर मोर्चा निघणार असल्याचा पुनरुच्चार खासदार शेट्टी यांनी यावेळी केला.सरकारच्या माध्यमातून दबावदरवर्षी सरकारच्या माध्यमातून संघटनेवर दबाव टाकला जायचा. आता सरकार आमचे आहे. आम्ही कारखानदारांवर दबाव टाकून त्यांना गुडघे टेकायला लावू, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.श्सळीतून भाकरी व नळीतून भाजीआमचे चार-सहा आमदार जरी निवडून आले असते, तरी पवार काका-पुतण्यांना सळीतून भाकरी व नळीतून भाजी आम्ही निश्चितच दिली असती, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.