शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:23 IST

काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

गौरव सांगावकर राधानगरी/कोल्हापूर :  धरणपाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणपाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे आज, बुधवारी (दि.२६) सकाळी उघडले. या चार दरवाज्यातून  ५७१२ क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ७११२ क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी आहे. संभाव्य पुरपरिस्थिती लक्ष्यात घेवून जलसंपदा विभागाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  धरणाचा क्रमांक सहा चा स्वयंचलित दरवाजा सकाळी ८:१५ मिनीटांनी उघडला. तर पाठोपाठ सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी  क्रमांक ५ चा  स्वयंचलित दरवाजा उघडला. यानंतर १०:०३ मिनिटांनी क्र. ३ व १० वाजून ०६ मिनिटांनी क्रमांक ४ असे एकूण क्रमांक ३,४,५,६ दरवाजे उघडले. त्यानंतर दुपारी १ :२३ मिनिटांनी पाचवा दरवाजा उघडला. असे एकूण क्रमांक ३,४,५,६,७ या पाच दरवाज्यातून  ७१४० क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ८५४० क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते. या वर्षी मात्र मुसळधार पावसामुळे दरवाजे जुलै अखेरच उघडले.जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणातून विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीची पातळीत वाढ होणार आहे. दरम्यानच पन्हाळा तालुक्यातील धारवाडी डोंगर खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची उघडझाप राहिल्याने नद्यांचे पाणी संथगतीने वाढत आहे तरीही कोल्हापूरकरांच्या मनात महापुराची धास्ती आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू केले आहे. काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.पडझडीत २३.६८ लाखांचे नुकसानजिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ५६ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.‘एसटी’चे ३४ मार्ग बंदपुराचे पाणी रस्त्यावर आल्याने जिल्ह्यातील वाहतूक काहीशी ठप्प झाली आहे. एस.टी.चे ३४ मार्ग बंद झाले आहेत, तर १३ इतर जिल्हा मार्ग व १९ ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.अलमट्टी ५८ टक्के भरलेअलमट्टी धरण केवळ ५८ टक्के भरल्याने पुराचे पाणी गतीने पुढे सरकत आहे. या धरणातून सध्या प्रतिसेकंद ८८५७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणावर कोल्हापुरातील पुराची स्थिती अवलंबून असल्याने सगळ्यांच्या नजरा या धरणाकडे लागल्या आहेत.बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंदचभोगावती नदीवरील बालिंगा पूल हा सव्वाशे वर्षांपूर्वीचा असून, मध्यंतरी त्याची डागडुजी केली होती. मात्र, सुरक्षितेच्या कारणासाठी मंगळवारी वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे बंदच करण्यात आल्याने नागरिकांची गैरसाेय झाली आहे.जिल्ह्यातील २७ गावांतील शाळा बंदजिल्ह्यातील नद्यांना आलेला पुराचा विचार करता करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील २७ गावातील शाळांना आज, बुधवारी सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणीriverनदीfloodपूर