शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:23 IST

काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

गौरव सांगावकर राधानगरी/कोल्हापूर :  धरणपाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणपाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे आज, बुधवारी (दि.२६) सकाळी उघडले. या चार दरवाज्यातून  ५७१२ क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ७११२ क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी आहे. संभाव्य पुरपरिस्थिती लक्ष्यात घेवून जलसंपदा विभागाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  धरणाचा क्रमांक सहा चा स्वयंचलित दरवाजा सकाळी ८:१५ मिनीटांनी उघडला. तर पाठोपाठ सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी  क्रमांक ५ चा  स्वयंचलित दरवाजा उघडला. यानंतर १०:०३ मिनिटांनी क्र. ३ व १० वाजून ०६ मिनिटांनी क्रमांक ४ असे एकूण क्रमांक ३,४,५,६ दरवाजे उघडले. त्यानंतर दुपारी १ :२३ मिनिटांनी पाचवा दरवाजा उघडला. असे एकूण क्रमांक ३,४,५,६,७ या पाच दरवाज्यातून  ७१४० क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ८५४० क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते. या वर्षी मात्र मुसळधार पावसामुळे दरवाजे जुलै अखेरच उघडले.जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणातून विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीची पातळीत वाढ होणार आहे. दरम्यानच पन्हाळा तालुक्यातील धारवाडी डोंगर खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची उघडझाप राहिल्याने नद्यांचे पाणी संथगतीने वाढत आहे तरीही कोल्हापूरकरांच्या मनात महापुराची धास्ती आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू केले आहे. काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.पडझडीत २३.६८ लाखांचे नुकसानजिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ५६ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.‘एसटी’चे ३४ मार्ग बंदपुराचे पाणी रस्त्यावर आल्याने जिल्ह्यातील वाहतूक काहीशी ठप्प झाली आहे. एस.टी.चे ३४ मार्ग बंद झाले आहेत, तर १३ इतर जिल्हा मार्ग व १९ ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.अलमट्टी ५८ टक्के भरलेअलमट्टी धरण केवळ ५८ टक्के भरल्याने पुराचे पाणी गतीने पुढे सरकत आहे. या धरणातून सध्या प्रतिसेकंद ८८५७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणावर कोल्हापुरातील पुराची स्थिती अवलंबून असल्याने सगळ्यांच्या नजरा या धरणाकडे लागल्या आहेत.बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंदचभोगावती नदीवरील बालिंगा पूल हा सव्वाशे वर्षांपूर्वीचा असून, मध्यंतरी त्याची डागडुजी केली होती. मात्र, सुरक्षितेच्या कारणासाठी मंगळवारी वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे बंदच करण्यात आल्याने नागरिकांची गैरसाेय झाली आहे.जिल्ह्यातील २७ गावांतील शाळा बंदजिल्ह्यातील नद्यांना आलेला पुराचा विचार करता करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील २७ गावातील शाळांना आज, बुधवारी सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणीriverनदीfloodपूर