शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बळिराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा ...

कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तींचे बळ मिळाले आहे. यामुळे बळिराजाचा झेंडा केंद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापुरातील बिंदू चौक येथे पिठलं-भाकरी व सत्याग्रह आंदोलन केले.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावे लागते हे दुर्दैवी आहे. सर्व पिकांना हमीभाव निश्चित झाला पाहिजे. माजी आमदार संपतराव पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, नामदेव गावडे, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, आदील फरास, प्रकाश गवंडी, सचिन पाटील, तौफीक मुल्लाणी, सुनील पाटील, श्रावण फडतारे, आदी उपस्थित होते.

चौकट

ढेकणे झाली म्हणून घर जाळू नका

व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम बाजार समिती आणल्या. कमी उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांचा माल बहुराष्ट्रीय कंपनी खरेदी करणार नसल्याने बाजार समित्यांशिवाय पर्याय नाही. ढेकणे झाली म्हणून कोणी घर जाळत नाही, तर ढेकणाचा बंदोबस्त करणे हाच मार्ग असल्याचे शेट्टी यांनी सुनावले.

चंद्रकांत पाटील यांना बिंदू चौकात येण्याचे खुले आव्हान

चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा कायदा वाचावा आणि मग चर्चेसाठी त्यांनी बिंदू चौकात यावे. ज्यांच्या नखाला माती लागली नाही, बांधावर कधी गेले नाहीत, त्यांनी शेतकरीहिताचे बोलू नये, असा टोला शेट्टी यांनी हाणला.

विनोद...