शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पहिले अपयश ते ‘लेफ्टनंट’ पदापर्यंत

By admin | Updated: December 23, 2014 00:41 IST

अजिंक्य पोवारचा प्रवास : टेक्निकल अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील एकमेव कॅडेट

कोल्हापूर : सातत्य, प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन आणि अपार कष्ट या जोरावर कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील अजिंक्य पोवार यांनी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारली आहे. ध्येयाची निश्चिती, मनाची आणि कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश हे मिळतेच असे अजिंक्य पोवार यांनी आज, सोमवारी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.शिवाजी पेठेतील रंकाळा स्टॅँड परिसरातील एका सर्वसामान्य कुटुंबात अजिंक्य यांचा १४ एप्रिल १९९१ला जन्म झाला. वडील अरविंद पोवार एका कंपनीत नोकरीतून निवृत्त झालेले. आई अनुराधा गृहिणी, लहान भाऊ अमित हा सध्या न्यू कॉलेजमध्ये बी.ए.च्या तिसऱ्या वर्षात शिकतो. तो शिवाजी तरुण मंडळाचा फुटबॉल खेळाडू आहे. याशिवाय भक्कम पाठबळ देणारे पाच चुलते व मामा आहेत.लेफ्टनंट पदापर्यंतच्या वाटचालीविषयी ते म्हणाले, आपले प्राथमिक शिक्षण आदर्श विद्यालय, तर माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमध्ये झाले. यानंतर पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन इयत्ता पाचवीला सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये निवड झाली. या ठिकाणीच आपल्याला सैन्यदलाविषयी प्राथमिक माहिती व आवड निर्माण झाली. यावेळीच आपण सैन्य दलातील मोठे अधिकारी व्हायचे असे ठरविले. त्यादृष्टीनेच आपला विचार राहिला. बारावीपर्यंत सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाले. बारावीनंतर २००८ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)ची परीक्षा दिली. ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो; परंतु वैद्यकीय चाचणीत अडचण आल्याने यावेळी निवड होऊ शकली नाही. २००९मध्ये आपण कोल्हापुरातील भारती विद्यापीठात इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनला प्रवेश घेतला. डेहराडून येथील एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर १३ डिसेंबरला आपल्याला दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या सहीचे प्रमाणपत्र मिळाले. तो क्षण आपल्या आनंदाचा सर्वोेच्च क्षण होता. प्रशिक्षणाविषयी ते म्हणाले, आपला दिवस पहाटे ५ वाजता सुरू व्हायचा. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग, शारीरिक व्यायाम, घोडेस्वारी आदी आवरल्यानंतर दुपारी युद्ध अभ्यासाचे तास, सायंकाळी मैदानी खेळ, रात्री पुन्हा अभ्यासाचे तास असे दैनंदिन नियोजन होते. सध्याच्या पिढीने अपार कष्टाची तयारी ठेवावी, आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च टोक गाठून देशाचे नाव उज्ज्वल करावे. आपले स्वत:चे आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. भारतीय सैन्यदलातही सेवेच्या अनेक संधी आहेत. २०१३मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर आॅक्टोबर २०१३ला दिलेल्या परीक्षेत आपल्याला यश येऊन देशात आपल्याला सहावा क्रमांक मिळाला. टेक्निकल अभ्यासक्रमात देशातून ६० जणांची निवड झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातून आपण एकमेव आहे. आपले बरेच मित्र हे सैन्यात आहेत. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केले. त्यामुळे आपल्यातील जोश वाढला आणि आपण हे ध्येय साध्य करू शकलो.