शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेत २५ गावांत शेतकरी कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

तालुक्यामध्ये २०१९ पेक्षाही मोठा महापूर आल्याने २५ गावातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, शेतमजूर, पोट्री व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

तालुक्यामध्ये २०१९ पेक्षाही मोठा महापूर आल्याने २५ गावातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, शेतमजूर, पोट्री व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तालुका महापुराच्या मगरमिठीत सापडला आहे. पंचगंगा,वारणा नदीच्या महापुरामुळे २५ गावांना फटका बसला आहे. ७ गावांचा संपर्क तुटला आहे. ७ हजार ५२ हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत.यामध्ये ऊस २१८९ हेक्टर

, भुईमूग १९०८, सोयाबीन २४४७ ,भाजीपाला १९८,भात १०१ इतर पिके १०० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. पुरामुळे रुई -पट्टणकोडोली, पारगाव - निलेवाडी, खोची -दुधगाव, कुंभोज- सावळवाडी, इचलकरंजी -रेंदाळ -रांगोळी आदी प्रमुख मार्ग बंद आहेत. आजअखेर १०१५२ कुटुंबातील ४२ हजार १८६ नागरिकांनी स्थलांतर केले असून पंचगंगेच्या महापुरातील १० गावातील ७०८० कुटुंबे आणि वारणा महापुरातील ११ गावातील २०७२ कुटुंबे अशी तालुक्यातील २१ गावातील १०१५२ कुटुंबे एन.डी.आर.एफ. आणि स्थानिक मदतीने नातेवाईक आणि शासकीय निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केली आहेत.

नवा रस्ता शेतीच्या मुळावर

पूरबाधित गावात रस्ता करत असताना रस्त्याची उंची वाढणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित असते,परंतु याचा विचार न करता मोठ्या प्रमाणात रस्त्याची उंची वाढवल्याने भादोले, किणी,घुणकी,चावरे, पारगाव, निलेवाडी येथील शेती मोठ्या प्रमाणात पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.