शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

आता संध्याकाळपर्यंत कधीही होणार शालेय पोषण आहाराची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:31 IST

तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवीण यादव यांचा निर्णय

कोल्हापूर : जिल्'ातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शालेय पोषण आहाराच्या दर्जाची आता कधीही तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहाराचा नमुना शिल्लक ठेवण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

शाळांमध्ये दिल्या जात असलेल्या पोषण आहाराचा दर्जा चांगला नसल्याची बाब यादव यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याशी चर्चा करून याबाबत दोघांच्या सहीने परिपत्रक काढले आहे.जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, शिक्षण सभापती व समिती सदस्य यांच्याकडून या पोषण आहाराची कधीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आहाराचा नमुना सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेतच ठेवणे बंधनकारक राहणार आहे. आहाराचा दर्जा चांगला नसेल तर संबंधित ठेका रद्द करण्यात येणार आहे. आहारामध्ये वापरण्यात येणारा भाजीपाला, फळे, तांदूळ, कडधान्ये, तेल, पीठ या साहित्याचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे.

स्वयंपाकासाठीची भांडी स्वच्छ असावीत. परिसरामध्येही स्वच्छता असावी. पिण्यासाठीचे पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे. स्थानिक शिक्षण समिती सदस्यांनीही आहार संध्याकाळपर्यंत ठेवला आहे किंवा नाही याची खात्री करावी. तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. 

 

शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा, तेथे स्वच्छता असावी, यासाठी कधीही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शालेय पोषण आहाराचा दर्जा चांगला राहण्यासाठी मदत होईल.- प्रवीण यादवसभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoshan Parikramaपोषण परिक्रमाkolhapurकोल्हापूर