शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कधी सर्व्हर डाऊन, तर कधी आॅनलाईन जोडणीला खो !

By admin | Updated: June 23, 2015 00:20 IST

विद्यार्थ्यांचे नाकीनऊ : सेतू केंद्रातून विविध दाखले मिळण्यास अडचण; दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यासह पालकांची झुंबड

कोल्हापूर : दहावी आणि बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्न, अधिवास, रहिवासी, नॉनक्रिमिलेअर आदी दाखले प्रवेश अर्जासोबत सक्तीचे असल्याने कसबा बावडा येथील सेंट्रल बिल्डींगमध्ये असलेल्या सेतू केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मात्र, कधी सर्व्हर डाऊन, तर कधी आॅनलाईन कनेक्टिव्हीटी न मिळाल्याने हे दाखले वेळेत मिळताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊआले आहे. नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे जून महिना आला की, शाळा, महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी पदविका, कृषी पदविका, कृषी प्रमाणपत्र कोर्स, वैद्यकीय आदी शाखांना प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते. त्याचप्रमाणे या प्रवेशांसाठी प्रवेश अर्जासोबत सत्य गुणपत्रिकेसोबत शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, अधिवास, रहिवासी, रहिवास डोंगरी आदी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना जोडावी लागतात. मात्र, प्रवेशाची अंतिम तारीख आणि दाखला मिळण्याची अंतिम तारीख दोन्ही जवळ असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही सँडविच होते. यात दिवसाला उत्पन्नाचा, नॉनक्रिमिलेअर, रहिवासी आदी दाखले काढण्यासाठी सध्या सेतू केंद्रात दिवसाला २०० हून अधिक अर्ज येतात. तर ६० ते ७० विविध दाखले विद्यार्थ्यांना अग्रक्रमानुसार आलेल्या अर्जानुसार दिले जातात. प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतरच हे दाखले त्वरित मिळावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, हे दाखले कधी आणि किती दिवस आधी काढले तरी चालतात, याबद्दल माहिती नसल्याने अनेक पालक अगदी प्रवेश तोंडावर आल्यावरच या सेतु केंद्रांकडे धाव घेतात. एकाच वेळी सर्व पालक विद्यार्थी आल्याने सेतू केंद्रामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. महाआॅनलाईनचा सर्व्हर डाऊनचराज्यभरात महाआॅनलाईन हा सरकारचा सर्व्हर राज्यभरातील सेतू केंद्रांना जोडला आहे. हा सर्व्हर मुंबई येथे असल्याने राज्यभरातील सेतू केंद्रांचा भार यावर आहे. त्यामुळे ऐन कामाच्या वेळीच या सर्व्हरचा वेग मंदावतो. त्यामुळे दाखले देण्यास विलंब होत आहे.दिवसाला या सर्व्हरवर सध्या प्रवेशाचे दिवस असल्याने अडीच लाखांहून अधिक अर्ज दाखल होत आहेत. त्यामुळे क्षमता कमी अन् भार जास्त झाल्याने वेग मंदावणे, मध्येच सलग्नता तुटणे, सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार घडत आहेत. दाखल्यांसाठी हेही करता येईलउत्पन्नाच्या दाखल्यांसाठी केवळ ३३ रुपये शुल्क आकारणी केली जाते. तर हा दाखला एप्रिलनंतर केव्हाही काढला तरी चालतो. तर जातीचा, नॉनक्रिमिलिअर, शेतकरी, अधिवास आदी दाखले ६ महिन्यांत कधीही काढले तरी चालतात. या दाखल्यांसाठी ३३ रुपयांचे शुल्क व अ‍ॅफिडेव्हिटचे ३३ रुपये असे एकूण ६६ रुपये खर्च येतो. त्यामुळे पालकवर्गाने जून महिना आल्यानंतरच जागे होऊन हे दाखले काढण्यासाठी धाऊ नये. त्यापूर्वीच प्रवेश इच्छुक दहावी, बारावीच्या पालक, विद्यार्थ्यांनी हे काढले तरी चालतात. आॅक्टोबर महिन्यात सर्व शाळांमध्ये दाखल्यांसाठी शिबिरेही आयोजित केल्या जातात. पण याकडे लक्ष कोण देत नाही.