शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला तरी पंचगंगा धोका पातळीवर, जिल्ह्यातील १३९ शाळा बंद, ४० कुटुंबे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:14 IST

कोल्हापूरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आला

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातील विसर्ग कायम असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा (३९ फूट) पातळी ओलांडून धोका पातळीवर गेल्याने कोल्हापूरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर केर्ले-केर्ली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक जोतिबा मार्गे वळवण्यात आली आहे. कोल्हापूर मधून कसबा बावडा मार्गे शियेला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूर, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १३९ प्राथमिक व माध्यमिक शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या.गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळला. सर्वच तालुक्यांना अक्षरश: झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. मात्र, बुधवारी सकाळपासून जोर काहीसा ओसरला. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या, तरी तुलनेत तीव्रता कमी झाली आहे. धरण क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, उर्वरित तीन दरवाजांतून प्रति सेकंद ८६४० घनफूट तर दूधगंगेतून १८ हजार ६०० व वारणातून २९ हजार ८०७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला असला, तरी नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी ४२ फुटांवरून वाहत असून, धोका पातळीकडे वाटचाल सुरू असल्याने नदी, ओढ्याकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे.तालुकानिहाय शाळा बंद -गगनबावडा - ४६, पन्हाळा - ३४, राधानगरी - ३०, शाहूवाडी - १५, भुदरगड - ९, करवीर - ५

जिल्ह्यातील ४० कुटुंबे बाधितजिल्ह्यात पुरामुळे ४० कुटुंबांतील १७६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्याचबरोबर दक्षता म्हणून संबंधित कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एस. टी.च्या ६० फेऱ्या रद्दपुराचे पाणी रस्ते, बंधाऱ्यावर आल्याने एस. टी. महामंडळालाही फटका बसला आहे. दहा राज्य तर २९ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. दिवसभरात ६० फेऱ्या रद्द झाल्या आहेत.अलमट्टीतून अडीच लाखांचा विसर्गकोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने अलमट्टीच्या विसर्गाकडे लक्ष केंद्रित केले आहे. हिप्परगी धरणातून प्रति सेकंद १ लाख २५ हजार ९६१ तर अलमट्टी धरणातून अडीच लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पडझडीत ५३ लाखांचे नुकसानजिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १३० खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ५३ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.