शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेल्या चितेबरोबरच भावनांचाही कल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST

कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या ...

कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या मनाची अवस्था आहे; परंतु गेले वर्षभर कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतोय, मन फार व्याकुळ होऊन गेलंय. पेटलेल्या चितेबरोबरच मनातील भावनांचाही कल्लोळ माजलेला आहे. प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिला की हात जोडून प्रार्थना करतोय...भगवंता आता हे सगळं थांबव बाबा... अशी वेळ पुन्हा माणसांवर आणू नकोस.

पंचगंगा स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करीत असलेल्या बाळासाहेब भोसले या महानगरपालिका कर्मचाऱ्याची ही आंतरिक विनंती परमेश्वर ऐकणार की नाही माहीत नाही, पण ज्याच्या घरातील व्यक्ती मृत्यू होतात, त्यांना जेवढ्या वेदना होतात तितक्याच वेदनांनी भोसलेसुद्धा व्याकुळ होतात. मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे क्रियाकर्म पार पाडत असताना एकीकडे मृताच्या नातेवाइकांना आधार देणं, त्यांना मदत करणे यांसह स्वत:च्या आतील भावनांनाही वाट करून देण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागत आहे.

कोविड साथीत मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने स्मशानभूमीतील कामाचा ताणही प्रचंड आहे. तरीही न थकता, न दमता वीसहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. नेहमीच्या कामापेक्षा सध्याचं काम अधिक जोखमीचं, धोकादायक आहे. स्वत:च्या जीवाला जपण्यापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. ज्या स्मशानभूमीत लोक जायला घाबरायला लागले आहेत तिथे हे कर्मचारी काम करत आहेत.

आम्ही मानवतेचे वारस..

प्रत्येक दिवशी रुग्णालयातून एका एका वाहनातून चार पाच मृतदेह आणले जातात. मृतदेहावर चिकटवलेल्या लेबलवर त्या व्यक्तीचे नाव असते. त्याप्रमाणे आधी नोंद केली जाते. नंतर मृतदेह खाली उतरुन घेतला जातो. जागा उपलब्धतेनुसार सरणावर किंवा गॅस दाहिनीत ठेवून अंत्यसंस्कार करतो. रक्तातील नातेवाईक कोणीच जवळ नसतो. आम्हीच त्यांचे नातेवाईक बनतो, रक्ताचे नसलो तरी मानवतेचे वारस आम्हीच असतो. जड अंत:करणाने अग्नी देतो. चिता शांत झाली की रक्षा विसर्जनसुद्धा आम्हीच करतो, असे तेथील कर्मचारी गहिवरलेल्या स्वरात सांगत होते.

मुखात पाणी नाही, की शेवटचं दर्शन

काही नातेवाईक लांबूनच आम्हाला सांगतात, जरा चेहरा आम्हाला दाखवा. गयावया करतात; पण मृतदेह रुग्णालयातूनच गुंडाळून दिलेला असल्याने आणि आम्हाला तो सोडायचा नाही, अशा स्पष्ट सूचना असल्याने आम्हीच त्यांना म्हणतो.. माफ करा.. आम्ही चेहरा दाखवू शकत नाही. एरव्ही अंत्यदर्शन घेणे, शेवटी सरणावर गेल्यावर मुखात पाणी घालण्याचा एक भावनिक विधी होतो, पण यावेळी ते शक्य नाही. शेवटचं दर्शन नाही, की मुखात पाणी नाही. नातेसंबंधाने हक्क असूनही अग्नी देण्याची साेय राहिली नाही. माणूस माणसाला परका झाला आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर भगवंताला विनंती करतोय.... भगवंता हे सारं थांबवं. इतका पण क्रूर वागवू नकोस!

-अख्ख गाव ध्यानस्थ बसलं -

लांजातील एका व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. त्याचा मुलगा सांगत होता. माझे वडील खूप चांगले होते. गावासाठी, गावातील नागरिकांसाठी त्यांनी भरपूर केलं. कोरोनाने आजारी पडले बरे व्हावेत म्हणून अख्खं गाव आठ दिवस ध्यानस्थ बसले. पण आज त्यांचा चेहरा गावालाच काय कुणालाच पहायला मिळाला नाही. ही आठवण सांगताना चांगली माणसंसुध्दा या साथीने ओढून नेल्याची भावना कर्मचारी व्यक्त करतात..