शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांच्या आघाडीमुळे आवाडेंना डावलले

By admin | Updated: December 12, 2015 01:00 IST

पतंगराव कदम : ‘आत एक, बाहेर एक’ भूमिकेमुळे महाडिकांना उमेदवारी नाकारली

कोल्हापूर : प्रकाश आवाडे पक्षात ज्येष्ठ असल्यामुळे उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. त्यांना मेरिटनुसार उमेदवारी मिळाला हवी होती. मात्र, महादेवराव महाडिक यांच्याशी आघाडीचा घोटाळा केल्यामुळेच पक्षाने प्रकाश आवाडे यांची उमेदवारी कापली आहे, असे आपल्या खास शैलीत कॉँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री व आमदार पतंगराव कदम यांनी शनिवारी सांगितले. येथील ‘ड्रीमवर्ल्ड’मध्ये विधानपरिषदेचे कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या प्रचारार्थ बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.कदम म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षातून जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवडे, महादेवराव महाडिक इच्छुक होते. काँग्रेसची उमेदवारी मागण्यासाठी तिघेही आले. त्यावेळी मी तिघांनाही सांगितले की, तुमची स्वतंत्र ताकद आहे तर आघाडी करून कशाला मागता? वैयक्तिक मागा, असे मी सुनावलो होतो. मात्र, तिघांपैकी कोणालाही द्या; पण बंटी पाटील यांना नको, असे आघाडीचा घोटाळा करून तिघेही सांगत राहिले. त्यामध्ये मेरिट असतानाही प्रकाश आवाडे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला प्रामाणिकपणे मदत केली नाही. आत एक आणि बाहेर एक अशी भूमिका घेतली. त्यामुळे महादेवराव महाडिक यांनाही उमेदवारी पक्षाने नाकारली. समरजित घाटगे म्हणाले, राजे गट यापूर्वीही सतेज पाटील यांच्या पाठीशी होता. आताही राहणार आहे. त्यांना ‘माजी आमदार’ असे म्हणतात याची खंत वाटत होती. ते आता विधानपरिषदेत निवडणुकीत निवडून येऊन आमदार होतील. माजी राज्यपाल डी. वाय पाटील म्हणाले, पक्षावर निष्ठा ठेवून चांगले काम केले. त्याची दखल घेतल्यामुळे उमेदवारी मिळाली आहे.जनसुराज्य पक्ष, शाहूवाडी आघाडी, राष्ट्रवादी, अपक्ष या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. यावेळी नगराध्यक्षा विद्या पोळ, राजीव आवळे, माजी मंत्री रमेश बागवे, मदन कारंडे, राजू लाटकर यांची भाषणे झाली. यावेळी कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. प्रल्हाद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मुश्रीफ बनेल...मुश्रीफांना महानगपालिकेच्या सत्तेत झुकते माप दिले आहे. ते बनेल असल्यामुळेच कागलच्या कट्ट्यावरून आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत, असा टोला कदम यांनी लगावताच हशा पिकला.राष्ट्रवादी काँग्रेसचे पिल्लू...राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील वादामुळे सत्ता जाईल आणि नंतर चटके बसतील, असे मी सांगत होतो. आता तसेच झाले आहे. या निवडणुकीतही मुश्रीफ यांनी शब्द खरा ठरवत सतेज पाटील यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावावी. राष्ट्रवादी काँग्रेसचेच पिल्लू आहे, असाही टोला कदम यांनी लगावला. जयंत पाटलांना सांगा...राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र राहणे आवश्यक आहे, असे कदम यांनी सांगितले. त्यावेळी मुश्रीफ यांनी ‘जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत घेण्यास सांगावे,’ असे सांगितले. यावर कदम यांनी ‘सांगलीत जयंत पाटील यांना अगोदर तसे सांगावे,’ असे सांगितले.