शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभवाने वीरेंद्र मंडलिक यांची नाराजी ठीक आहे. त्याचे निरसन केले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभवाने वीरेंद्र मंडलिक यांची नाराजी ठीक आहे. त्याचे निरसन केले आहे. राजकारणात पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय घेतला जातो, असे उत्तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्या नाराजीवर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर कागल तालुक्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यात गुरुवारी वीरेंद्र मंडलिक यांनी ‘माझा पराभव झाला नाही, तर तो केला गेला’ अशी फेसबुक पोस्ट टाकून उघड नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता, शुक्रवारी सकाळी पराभूत चौघांच्या घरी जाऊन आपण आलेलो आहे. चार उमेदवार पराभूत झाले. त्याची कारणमीमांसाही तपासू, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पराभवामुळे वीरेंद्र मंडलिक नाराज आहेत ठीक आहे, ते एकटेच पराभूत झाले नाहीत. इतरही तिघे आहेत. क्रॉस व्होटिंगचा फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे. पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय व्यक्त केला जातो. मागील निवडणुकीतही विरोधी आघाडीतील दोघे विजयी झाले होते, असे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

शपथा घेतल्या तरी क्रॉस व्होटिंग

नेत्यांसह ठरावधारकांच्या शपथा घेतल्या तरी क्रॉस व्होटिंग झाले. दुर्दैवाने शंभर-दीडशे मतांचा फरक पडला, क्रॉस व्होटिंग दरवेळी होते, यावेळी शपथा घेतल्या तरी ते थांबले नाही. यामध्ये गरीब कार्यकर्त्याचा बळी जातो. ‘मोडस ऑपरेंडी’ ही बदलावी लागेल. संचालकांनी चांगले काम करून आताच्या मताधिक्यात हजार, दीड हजार जादा मते घेण्याचा प्रयत्न करा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.