शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बघ्याची नको, लढ्याची तयारी ठेवा

By admin | Updated: August 18, 2015 23:44 IST

एन. डी. पाटील : वाढीव दराने वीज बिले भरणार नाही; इरिगेशन फेडरेशनच्या मेळाव्यात शेतकऱ्यांचा निर्धार

कोल्हापूर : ‘महावितरण’ने केलेली दरवाढ एकतर्फी, अन्यायी आहे. त्याला वेळीच रोखणे आवश्यक आहे. अन्यथा महावितरण आपल्याला लुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वीज दरवाढीच्या प्रश्नाविरोधात संघटित व्हा. लढ्याची तयारी ठेवा. लढ्याबाबतची तुमची तयारी दिसली की, त्यात तुमच्यापुढे एक पाऊल मी असेन. बघ्याची भूमिका घेऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे शेतकऱ्यांना केले. वाढीव दराने आलेली कृषिपंपांची वीज बिले न भरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे आयोजित सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात केला.वीज दरवाढीविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात मेळावा झाला त्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, संपतराव पवार-पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, उपस्थित होते.ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील म्हणाले, ‘महावितरण’ने केलेली ४४ पैशांची दरवाढ आयोगाकडे न जाता आणि आम्हाला नोटीस न देता एकतर्फी केली आहे. त्याला कोणताही आधार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. ‘महावितरण’चा आजपर्यंतचा अनुभव पाहता सहजपणे दरवाढ मागे घेतली जाईल असे वाटत नाही. संप हे आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठीचे हत्यार आपल्याजवळ नाही. त्यामुळे महावितरण आणि पर्यायाने सरकारशी दोन हात करण्यासाठी तयार राहा. माझा श्वास असेपर्यंत तुमच्या प्रश्नांसाठी लढा देत राहीन. पण, दरवाढी तसेच अन्य प्रश्न केवळ एकट्या-दुकट्याचे नाहीत. ते समस्त शेतकऱ्यांचे आहेत. ज्यांच्याशी संघर्ष करावयाचा आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल काही देणे-घेणे नाही. त्यामुळे आपल्या लढ्याबाबत बघ्याची भूमिका घेऊ नका, संघटित आणि सक्रियपणे यात सहभागी व्हा.मेळाव्यात दरवाढ मागे घेईपर्यंत सध्या वाढीव दराने आलेली वीजबिले न भरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. यावेळी बाबासाो पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, जे. पी. लाड, सखाराम पाटील, आर. के. पाटील, सुभाष शहापुरे, मारुतराव जाधव, रणजित जाधव, मारुती पाटील आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी, सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गटनिहाय समित्या स्थापन करावीज, ठिंबक सिंचन आदींचे अनुदान बंद करून शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. सध्याची वीज दरवाढ अन्यायी असल्याने त्याविरोधात लढा देण्याची गरज आहे शिवाय गावांमध्ये गटनिहाय समित्यांची स्थापना करून ‘महावितरण’च्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यात यावे, असे आवाहन अरुण लाड यांनी केले.ऊर्जामंत्र्यांच्या कार्यवाहीवर पुढील दिशाशासन व ‘महावितरण’ने विद्युत नियामक आयोगाच्या जाहीर सुनावणीवेळी कृषिपंपांना दरवाढ मान्य केली नसताना तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत कृषिपंपांना दरवाढ करणार नसल्याचे जाहीर केले असताना ‘महावितरण’ने एकतर्फी दरवाढ केल्याचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, १ जून २०१५ पासून ७२ पैसे प्रतियुनिट असलेला वीजदर १ रुपये १६ पैसे करून ४४ पैशांची दरवाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. ‘महावितरण’ने केलेली दरवाढ मागे घ्यावी, याबाबत ऊर्जामंत्र्यांना गेल्या आठवड्यात निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून जी कार्यवाही होईल, त्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.