शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांची परवड  : दिव्यांगांचे प्रकार वाढले, सुविधांच्या नावाने शंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 11:15 IST

दिव्यांगांनाच सुविधा देण्याच्या नावाने शासकीय पातळीवर आनंदीआनंद असताना, आता आणखी संख्या वाढविल्याने लाभ मिळण्याच्या मार्गात अडचणींचा डोंगर उभा राहिल्याने; ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था दिव्यांगांच्या वाट्याला आली आहे.

ठळक मुद्देदिव्यांगांचे प्रकार वाढले, सुविधांच्या नावाने शंख ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था

नसिम सनदी

कोल्हापूर  :  केंद्र शासनाने २०१६ च्या दिव्यांग धोरणानुसार दिव्यांगांच्या प्रकारात तिपटीने वाढ केली आहे. ही संख्या आता सातवरून २१ वर जाऊन पोहोचली आहे. मुळात आहे त्या दिव्यांगांनाच सुविधा देण्याच्या नावाने शासकीय पातळीवर आनंदीआनंद असताना, आता आणखी संख्या वाढविल्याने लाभ मिळण्याच्या मार्गात अडचणींचा डोंगर उभा राहिल्याने; ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था दिव्यांगांच्या वाट्याला आली आहे.केंद्र शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये दिव्यांग अभियानांतर्गत अपंगत्वाच्या व्याख्येचा विस्तार केला; पण गेल्या दोन वर्षांतील कामकाज पाहिले की ‘अपंग’ या नावाची जागा ‘दिव्यांग’ शब्दाने घेतली, एवढाच काय तो फरक झालेला आहे.

बाकी एकूण मानसिकता पूर्वीप्रमाणेच कायम आहे. यांना लाभ मिळवून देणारी यंत्रणाच अपुरी असल्याने लाभाच्या प्रतीक्षेतील दिव्यांगांची संख्या वाढतच चालली आहे.नव्या धोरणानुसार अंध, मूक, श्रवणदोष, अस्थिव्यंग, मतिमंद, अंशत: अंध, अंशत: मूकबधिर हे पूर्वीचे दिव्यांगत्वाचे सात प्रकार होते. त्यांत आता आणखी १४ प्रकारांचा समावेश केला आहे. त्या

त अध्ययन अक्षम, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, मांसपेशीय क्षरण, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मल्टीपल स्क्लेरोसिस, थॅलेसेमिया, अधिक रक्तस्राव, सिंकल सेल, अ‍ॅसिड अटॅक, कंपवात रोग यांचा समावेश आहे.पेन्शनवाढ नाहीराज्य शासनाने २ सप्टेंबरला काढलेल्या अध्यादेशानुसार ८० टक्क्यांवर दिव्यांगत्व असणाऱ्यांना ६०० रुपयांची असणारी पेन्शन एक हजार केली. ८० टक्क्यांच्या खाली दिव्यांगत्व असणाºयांची पेन्शन ६०० वरून ८०० पेन्शन केली; पण आजतागायत वाढ तर राहू दे; आहे ती पेन्शनही कधी वेळेत मिळत नाही, अशी सार्वत्रिक तक्रार आहे.

या वाढीव पेन्शनसाठी उत्पन्नाची ५० हजार केली आहे; पण हे दाखले मिळत नाहीत. एक लाखाच्या उत्पन्नाची अट घालावी, अशी मागणी करूनही तिची पूर्तता झालेली नाही. गेल्या चार वर्षांपासून दिव्यांगांना शिष्यवृत्तीही मिळालेली नाही.दिव्यांगांना नोकरीची प्रतीक्षाचदिव्यांगांना त्यांच्या कोट्याप्रमाणे सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, असे खुद्द उच्च न्यायालयाने सांगितले. तरीही राज्य शासनाची यंत्रणा हललेली नाही. गेल्या चार वर्षांपासून १८०० दिव्यांग नोकरी लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत.राज्याचे दिव्यांग धोरणच नाहीदिव्यांगांकरिता धोरणे राबविण्याकरिता १९९५ मध्ये कायदा झाला. २०१६ मध्ये तो दिव्यागांत रूपांतरित झाला. या कायद्यानुसार स्वतंत्र अपंग धोरण अपेक्षित होत; पण महाराष्ट्राने आतापर्यंत हे धोरणच तयार केलेले नाही. ग्रामीण, शहरी भागांतील दिव्यांगांची परिस्थिती आणि त्यांना दिल्या जाणाºया सुविधा यांच्यासाठी हे धोरण गरजेचे आहे; पण हे धोरण अजून मसुद्यातच असून, ते प्रत्यक्षात जाहीर केलेले नाही.

महापलिका व नगरपालिकांकडे नोंद नाहीजिल्ह्यात आजच्या घडीला ४४ हजार ७८२ दिव्यांगाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी ग्रामीण भागातील आहे. यात महानगरपालिका व ११ नगरपालिकांचा समावेश नाही. महानगरपालिकेने दिव्यांगांचा सर्व्हेच केलेला नसल्याने त्यांच्याकडे आकडेवारीच उपलब्ध नाही. त्यामुळे अंदाजे आकडेवारी गृहीत धरून योजना राबविण्याचे धोरण महापालिकेचे दिसत आहे.

दिव्यांग निधी अन्यत्र वळविण्याच्या प्रकारात वाढदिव्यांगांसाठी २०१६ च्या धोरणानुसार तीन टक्क्यांऐवजी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी खर्च करणे बंधनकारक आहेच; शिवाय निधी वळविला तर शिस्तभंगाची कारवाईही करण्याची तरतूद आहे. तथापि पाच टक्के निधी खर्च करण्याच्या निर्णयाची जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये अंमलबजावणीच होताना दिसत नाही. यातील निधी इतर कामांकडे मात्र सर्रास वळविल्याच्या तक्रारी अपंग संघटनांनी निदर्शनास आणून दिल्या तरी कारवाई झालेली नाही.

जिल्ह्यातील दिव्यांग (कंसात संख्या)

  1. पूर्णता अंध : १३६१
  2. अंशत: अंध : ४७९३
  3. कर्णबधिर : ४९३७
  4. वाचादोष : २६१८
  5. अस्थिव्यंग : २०,६४१
  6. मानसिक आजार : २१००
  7. अध्ययन अक्षम : २२८
  8. मेंदूचा पक्षाघात : १८७७
  9. स्वमग्न : २०३
  10. बहुविकलांग : १७८७
  11. कुष्ठरोग : २९०
  12. बुटकेपणा : ६२८
  13. बौद्धिक अक्षमता : १९८५
  14. मांसपेशीय क्षरण : २२६
  15. मज्जासंस्थेचे तीव्र आजार : ३२०
  16. मल्टिपल स्क्लेरोसिस : १७५
  17. थॅलेसिमिया : १७५
  18. अधिक रक्तस्राव : ११३
  19. सिंकल सेल : ४९
  20. अ‍ॅसिड अटॅक : १४८
  21. कंपवात रोग : २४८

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर