शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भरतीत माणसे देताना डोंगळेंना संकलन आठवले नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात सहाशे कर्मचाऱ्यांची भरती ही विश्वास पाटील अध्यक्षपदी असतानाच झाल्याने, अरुण डोंगळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात सहाशे कर्मचाऱ्यांची भरती ही विश्वास पाटील अध्यक्षपदी असतानाच झाल्याने, अरुण डोंगळे यांनी भरतीबाबत त्यांनाच विचारावे. डोंगळे यांनी इतर संचालकांएवढेच कर्मचारी भरले आहेत; मग त्यावेळी दूध संकलन बारा लाख लिटर होते, याची जाणीव झाली नाही का? असा पलटवार ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मंगळवारी केला.

‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सोमवारी विरोधी शाहू आघाडीची घोषणा करण्यात आली, त्यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’च्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. दूध संघाचे संकलन बारा लाख असताना वीस लाख लिटर क्षमतेएवढी नोकरभरती केली. नेत्यांचा आदेश आला की मंजुरी दिली जायची, आदी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अध्यक्ष रवींद्र आपटे यांना विचारले असता, विश्वास पाटील अध्यक्ष असतानाच सहाशे कर्मचाऱ्यांची भरती झाली. त्यामुळे भरतीबाबत आम्हाला विचारण्यापेक्षा डोंगळेंनी त्यांनाच विचारावे. प्रसिध्दीच्या हव्यासापोटी काहीही बोलायचे योग्य नाही. इतर संचालकांच्या बरोबरीनेच डोंगळे यांनीही नोकर भरले, मग त्यांना त्यावेळी बारा लाख दूध संकलन आहे, याची जाणीव झाली नाही का? त्यांनी भरलेले कर्मचारी मागे बोलावणार का? याची उत्तरे डोंगळे यांनी द्यावीत. डोंगळे अध्यक्ष असताना नेत्यांचे आदेश येत नव्हते का? त्यावेळी कोणाच्या आदेशाने ते काम करत होते? अशी विचारणाही अध्यक्ष आपटे यांनी केली.

गाड्या विक्रीचा निर्णय महादेवराव महाडिक यांचाच

दूध संघाच्या संचालकांकडील गाड्यांबाबत टीका होते, त्यामुळे गाड्यांची विक्री करण्याचा सल्ला नेते महादेवराव महाडिक यांनीच ज्येष्ठ संचालकांच्या बैठकीत दिला होता. मात्र डोंगळे यांनी मिटिंगमध्ये येऊन गाड्यांचा मुद्दा आपलाच असल्याचे सांगत तो मांडल्याचे रवींद्र आपटे यांनी सांगितले.