शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ऊस क्षेत्रात होणार घट

By admin | Updated: December 14, 2015 00:07 IST

आजरा तालुका : पर्यायी पिकांना प्राधान्य

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाण्याअभावी ऊस पिकाच्या वजनामध्ये झालेली घट, वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान, उपसाबंदीचे संकट व पर्यायी भात पिकास मिळणारे घसघशीत दर यामुळे आजरा तालुक्यात ऊस क्षेत्रात यावर्षी घट होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.आजरा तालुक्यातून सुमारे पावणेदोन लाख टन ऊस उत्पादित होतो. त्यातील सरासरी ६० हजार टन ऊस प्रतिवर्षी बाहेरच्या साखर कारखान्यांना जातो. हा धोका स्थानिक आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ओळखून बाहेरच्या तालुक्यातील उसाला गाळपासाठी गेले चार वर्षे प्राधान्य दिले आहे. या प्रकारामुळे स्थानिक ऊस उचल करण्याचे नियोजन कोलमडते. परिणामी, तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.वर्षभर कष्ट करून पदरात काही पडेल याची खात्री उसाबाबत नाही, तर चार महिन्यांत भात पीक घेऊन घसघशीत उत्पन्न मिळण्याची हमी, असे चित्र असल्याने तालुक्यात यापुढे ऊस उत्पादन घटणार हे स्पष्ट आहे.एकीकडे ऊस उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची होत असलेली दमछाक, दरासाठी करावा लागणारा संघर्ष असे चित्र असताना दुसरीकडे भात पिकास मिळणारा घसघशीत दर, दारापर्यंत येऊन उचलीसाठी व्यापाऱ्यांकडूनच केली जाणारी धडपड, असा विरोधाभास दिसत आहे. हा विरोधाभासही उसाचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरू लागला आहे.तांदूळ विक्री केंद्रांत वाढऊस उत्पादकांसमोर ऊस उचल करण्यासाठी ऊसतोड टोळ्यांकडे करावी लागणारी विनवणी, शेती सेंटर आॅफिसला मारावे लागणारे खेटे, शेवटच्या टप्प्यात ऊसतोड टोळ्यांना द्यावी लागणारी भरमसाठ स्वरूपातील खुशाली, अशा सर्व प्रकारांना सामोरे जाण्याचे धाडसही हळूहळू कमी होऊ लागले आहे. एकीकडे ऊस उत्पादकांची अवस्था अशी असताना दुसरीकडे भात पिकाला मात्र चांगले दिवस येऊ लागले आहेत. घनसाळसारख्या भाताला विक्रमी ३५०० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळू लागला आहे. दिवसेंदिवस पर्यटकांच्या वाढत्या मागणीमुळे ठिकठिकाणी तांदूळ विक्री केंद्रे उघडली जात आहेत. भात उत्पादकांच्या बांधावर जाऊन व्यापारी वर्ग भात खरेदी करू लागला आहे.जंगलामध्ये पाण्याचे संपत आलेले साठे आणि चाऱ्याची निर्माण झालेली टंचाई यामुळे वन्य प्राण्यांनी शेतातील पिके आपले लक्ष्य बनविले आहे. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हतबल होऊन पिकांचे होणारे नुकसान बघत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून वन्य प्राण्यांचा त्रास होतो.पाणीटंचाईचे संकट : पिकासाठी पाणी कोठून आणणार?यावर्षी तर तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आहे. महसूलकडून पाणी उपसाबंदीचे हत्यार उपसले जात आहे. पाण्याचे साठे कोरडे पडू लागले आहेत. अशावेळी पिकासाठी पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आतापासून शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. पाणीच नसेल, तर ऊस कसा घ्यायचा? हा प्रश्नही बोलका आहे.