Kolhapur: शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच, दुषित पाण्यामुळे पंचगंगेच्या पाण्याला दुर्गंधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:42 IST2026-03-18T12:40:26+5:302026-03-18T12:42:20+5:30
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला

Kolhapur: शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच, दुषित पाण्यामुळे पंचगंगेच्या पाण्याला दुर्गंधी
कुरुंदवाड: गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या काळेकुट्ट, प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे. रसायनयुक्त, मैलायुक्त सांडपाण्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील नागरीक, विविध संघटना नदीप्रदूषण विरोधी आक्रमक झाले असतानाही दिवसेंदिवस दूषित पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनत चालला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याने दूषित पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.