दरम्यान, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी बेघरांना जागा, घरे मिळावीत या भूमिकेत प्रशासन व लोकप्रतिनिधी आहेत. त्यासाठी ५ फेब्रुवारीला पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची वेळ घेतली असून, या बैठकीत बेघरांची बाजू मांडून सकारात्मक निर्णय मिळविण्याचा प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तर पालिका प्रशासनाने दिलेल्या वेळेत बैठक घडवून निर्णय न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन तीव्र करून पालिकेचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा कसबे यांनी दिला. यावेळी नगरसेवक फारुख जमादार, प्रफुल्ल पाटील, रणजित डांगे, दयानंद मालवेकर उपस्थित होते. आंदोलनात संजय टेके, आप्पासोा बंडगर, वत्सला भोसले, सविता कोथळे, सुरेखा गडगे, अनिता गायकवाड, सुमय्या शेख, आकुबाई मोहिते, तबस्सुम शेख, मारुती थोरात यांच्यासह शेतमजूर संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी सहभागी झाले होते.
फोटो - २७०१२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाडमधील बेघरांना जागा मिळावी, या मागणीसाठी शेतमजूर संघटनेच्या वतीने पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आप्पासोा बंडगर यांनी मार्गदर्शन केले.