शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्रीधारकांवरील संकट व्यापाऱ्यांसाठी सुगीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकीकडे नैसर्गिक संकटाने पोल्ट्रीधारक ग्रासले असताना, दुसऱ्या बाजूला व्यापारी त्यांना राजरोसपणे लुटत ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एकीकडे नैसर्गिक संकटाने पोल्ट्रीधारक ग्रासले असताना, दुसऱ्या बाजूला व्यापारी त्यांना राजरोसपणे लुटत आहेत. पोल्ट्रीधारकांवरील संकट म्हणजे व्यापाऱ्यांना लुटीसाठी सुगीच येते. बर्ड फ्लूच्या भीतीचे अस्त्र दाखवून आता ५० रुपये किलोने पक्ष्यांची खरेदी करून दुकानदारांना ८० रुपये किलोने विक्री केली जाते. हाच पक्षी ग्राहकांच्या पदरात मात्र १२० रुपये किलोने पडतो. शेतकरी टू ग्राहक यामधील साखळीत तब्बल ७० रुपये मुरतात.

बर्ड फ्लूचा आजार आला असे समजताच, कोंबड्यांचे दर पडण्यास सुरुवात झाली आहे. या आजाराची महाराष्ट्रात तीव्रता किती आहे? कोल्हापुरात तो पोहोचला का? हे समजायच्या आतच व्यापारी मंडळी जाणीवपूर्वक या संकटाचा कांगावा करत सुटले आहेत. पक्ष्यांची विक्री करा अन्यथा तुम्ही अडचणीत याल, अशी भीती घालत असल्याने शेतकरी भीतीपोटी पोल्ट्री मोकळ्या करू लागले आहेत. या संकटाचा फायदा घेत व्यापारी ४० ते ५० रुपये किलो दराने पक्षी खरेदी करू लागले आहेत. तीन किलोचा पक्षी तयार होण्यासाठी साधारणत: ४५ ते ५० दिवस लागतात. त्यासाठी खाद्य, औषध व देखभालीचा खर्च २०० रुपये येतो. मात्र हाच पक्षी १५० रुपयांना विक्री करावा लागत आहे. अशा प्रकारे बर्ड फ्लूची भीती दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असताना, शासकीय यंत्रणेचे मात्र, या शेतकऱ्यांशी आमचा काहीच संबंध नसल्यासारखे वर्तन आहे. (उत्तरार्ध)

जुने व्हिडीओ सोशल मीडियावर

महाराष्ट्रात यापूर्वी २०१६ मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी जिवंत पक्ष्यांना गाडण्यात आले होते. त्यावेळचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरून व्हायरल केले जात असल्याने शेतकरी अधिकच भयभीत झाले आहेत.

ऐन किंक्रांतीत पोल्ट्रीधारकांवर ‘संक्रांत’

थंडीच्या काळात ब्रॉयलर कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातच किंक्रांतीचा सण आल्याने मागणी वाढते आणि दर तेजीत असतो. मात्र यंदा ऐन किंक्रांतीत पोल्ट्रीधारकांवर ‘संक्रांत’ आली आहे.

वीस दिवसांचे पक्षी कटिंगला

एरव्ही ४५ ते ५० दिवसांचा म्हणजेच तीन किलोचा पक्षी कटिंगला येतो. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने २० ते २५ दिवसांची पिले कटिंगला येत आहेत.

पोल्ट्रीधारकांचे विस्कटलेले गणित-

एका पिलाचा दर - ४८ रुपये

खाद्य (४५ दिवस) - १४० रुपये

औषध खर्च - १० रुपये

इतर खर्च - ५ रुपये

एकूण खर्च - २०३ रुपये

विक्रीतून मिळणारे पैसे - १५० रुपये

पोल्ट्रीधारकांना पॅकेज देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार - राजू शेट्टी

कोल्हापूर : गेली दोन वर्षे विविध संकटांनी पोल्ट्रीधारक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून त्याला सावरण्यासाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज द्यावे, यासाठी आपण येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

‘कडकनाथ’मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली, यामध्ये पोळलेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचे प्रश्न असताना, लॉकडाऊन काळात कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यावेळीही नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता बर्ड फ्लूचे नव्याने संकट आल्याने कोंबड्यांचे दर कोसळले आहेत. आता राज्य शासनाने बघ्याची भूमिका न घेता मदत करण्याची गरज आहे. लाखो रुपयांची कर्जे काढून व्यवसाय उभे केले, त्यांचे व्याज माफ करण्याबरोबरच पोल्ट्री व्यवसायासाठी पॅकेज द्यावे, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.