शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या आहेत. काठावर बहुमत असणाऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या आहेत. काठावर बहुमत असणाऱ्यांनी सावधानता म्हणून आपल्या सदस्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले आहे.

गेला महिनाभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. नात्यागोत्यातील संघर्षपूर्ण लढती पहावयास मिळाल्या. स्थानिक सोयीनुसार एकत्रित येऊन आघाड्या झाल्याने पक्षीय राजकारणाची किनार फारशी दिसली नाही. मात्र, भाऊबंदकी उफाळून आल्याने निवडणुकीत ईर्षा पहावयास मिळाली. निवडणूक झालेल्या ३८६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी काठावर बहुमत मिळाले आहे. सहा ठिकाणी त्रिशंकू अवस्था झाली आहे. या ठिकाणी सरपंच निवडीपर्यंत आपापले सदस्य सांभाळताना नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यात सरपंचपदाचे आरक्षण काढायचे आहे. आरक्षण काढल्यानंतर सदस्यांना सभा नोटीस लागू करून त्यानंतर आठ दिवसांनी सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत.

सरपंच निवडीपर्यंत फाटाफुट होऊ नये, यासाठी आघाडी प्रमुखांनी दक्षता घेतली आहे, तर जिथे काठावर बहुमत आहे, त्या ठिकाणी आपल्या गळाला कोणी लागतो, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नेतेमंडळींनी सत्तेबाबत दावे, प्रतिदावे केल्याने अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही उफाळून येणार आहे.

अपक्षांचा ‘भाव’ वधारला

अनेक गावांत अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आली आहे. सत्तेचा लंबक त्यांच्या हाती असल्याने त्यांचा ‘भाव’ चांगलाच वधारला आहे. सरपंच, उपसरपंच पदांवर दावा सांगितला जात आहे. नोकरीबरोबर अर्थकारणावरही तडजोडी सुरू आहेत.

प्रशासकांच्या हस्तेच यंदाचे ध्वजारोहण

मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. ऑगस्टपासून येथे प्रशासक कामकाज पाहत असून, मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार आहे.