शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -पुरवठा विभागाकडून १२ हजार टन गहू, तांदूळ उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:17 IST

संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच सकाळपासून रांगा लावून महिलांनी रेशनचे धान्य घेतले.

ठळक मुद्देपुरवठा विभागाकडून १२ हजार टन गहू, तांदूळ उपलब्ध१७१६ दुकानांतून ५ लाख ५७ हजार कार्डधारकांना लाभ

कोल्हापूर : संचारबंदीमुळे हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या अंत्योदय कुटुंबांच्या मदतीला सरकार धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून रेशनच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचे वितरण सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेतच सकाळपासून रांगा लावून महिलांनी रेशनचे धान्य घेतले.कोरोनामुळे गेल्या दहा दिवसांपासून सलगपणे जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. आधीच हातावरचे पोट, त्यात रोजगार हिरावल्याने उधार उसनवारी करीत कुटुंब जगविण्याची कसरत सुरू होती. आजही अनेक कुटुंबांतील चूल रेशनचे धान्य मिळाल्यावरच पेटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे धान्य कधी येते याची प्रतीक्षा होती.गोरगरिबांचे हाल कमी व्हावेत म्हणून रेशनचे तीन महिन्यांतील धान्य एकदम देण्याचा निर्णय झाला होता, तथापि हे धान्य ठेवण्यासाठी गोडावून आणि वाहतुकीच्या साधनांचा अडथळा असल्याने दर महिन्याचे रेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यासाठी जिल्ह्यातील ५ लाख आणि शहरातील ५७ हजार अंत्योदय कार्डधारकांना माणसी प्रती किलो २ रुपयांप्रमाणे गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिमाणसी तांदूळ देण्यास सुरुवात झाली.

जिल्ह्यातील १५५० आणि शहरातील १६६ दुकानांना जिल्हा पुरवठा विभागाकडून १२ हजार टन इतके धान्य पोहोचविण्यात आले. त्याचे वितरण लागलीच सुरू करण्यात आले. बोटांचे ठसे घेतल्याशिवाय रेशन दिले जात नव्हते, पण आता ठसे घेण्यास पॉस मशीन वापरण्यास मनाई असल्याने पूर्वीप्रमाणे कार्ड पाहून धान्य दिले गेले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर