शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लांबणीवर, कारण काय? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:00 IST

कोश्यारी यांना निमंत्रित केल्यामुळे अगोदरच हा सोहळा वादग्रस्त बनला होता

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा गुरुवारी (दि. १६) होणारा ५९वा दीक्षांत समारंभ प्रशासनाने सोमवारी लांबणीवर टाकला. काही अपरिहार्य कारणांमुळे हा समारंभ लांबणीवर टाकण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कुलपतींच्या अध्यक्षतेखाली हा दीक्षांत समारंभ होणार नाही. नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होऊन ते कुलपती पदावर आरूढ होत नाहीत, तोपर्यंत हा समारंभही लांबणीवर पडला आहे.दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल अँड रिलेशनचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कोश्यारी यांना निमंत्रित केल्यामुळे अगोदरच हा सोहळा वादग्रस्त बनला होता. त्यांनी राजीनामा दिल्याने वाद आपोआपच संपुष्टात आला. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी हा समारंभ नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर होईल असे निवेदन सोमवारी प्रसिद्धीस दिले. समारंभाची नवीन तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.विद्यापीठात मंडपाचे काम पूर्णया दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने जय्यत तयारी केली होती. ६६ हजार ४५७ पदवी प्रमाणपत्रांची छपाई पूर्ण झाली आहे. विद्यापीठ परिसराची स्वच्छता आणि रस्ता डागडुजी तसेच सुशोभीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठविणे, त्यांची बैठक व्यवस्था, ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडीचे नियोजन, समारंभाचे सभागृह, मुख्य इमारतीसमोरील परिसराची स्वच्छता ही कामे सोमवारीही सुरू होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ