शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसाठी आजपासून तोफा धडाडणार

By admin | Updated: June 25, 2015 01:14 IST

१२ जुलैला मतदान : १९ जागांसाठी १०८ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारपासून प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी-जनसुराज्य व शिवसेना-भाजप असा तिरंगी सामना होत असून, तिन्ही पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या चार दिवसांत होत असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. बाजार समितीच्या १९ जागांसाठी १०८ जण रिंगणात आहेत. माघार व मतदान यांमध्ये तब्बल एक महिन्याचा कालावधी असल्याने पॅनेलची घोषणा होऊन बारा दिवस झाले तरी अजून प्रचाराचे नारळ फुटलेले नाहीत. प्रचाराला प्रदीर्घ कालावधी असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी अजून गती घेतली नसली तरी व्यक्तिगत गाठीभेटी सुरू आहेत. कॉँग्रेसच्या पॅनेलचा प्रचार प्रारंभ आज अमृत मल्टीपर्पज हॉल येथून होत आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य-सतेज पाटील गटाच्या पॅनेलचा प्रचार उद्या, शुक्रवारी कागल येथून, तर शिवसेना-भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना पॅनेलचा प्रारंभ रविवारी (दि. २८) अमृतसिद्धी कळंबा येथून केला जाणार आहे. बाजार समितीवर गेली दहा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य पक्षाची सत्ता होती. संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे दोन वर्षांपूर्वी समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले. या पार्श्वभूमीवर समितीची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आघाडी पारदर्शक कारभाराचे उद्दिष्ट घेऊन रिंगणात उतरली आहे. राष्ट्रवादीचे नेते पारदर्शक कारभाराच्या आणाभाका घेऊन मतदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही संचालक मंडळाच्या बरखास्तीचा डाग धुऊन काढताना त्यांची दमछाक उडणार, हे नक्की आहे. शिवसेना नेत्यांनी बाजार समितीमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून कारवाई करण्यास पणन संचालकांना भाग पाडले होते. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात ते माजी संचालकांचा कारभार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडणार, हे नक्की आहे. कॉँग्रेसही प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करते की, इतर संस्थांमधील सोयीच्या राजकारणासाठी थोडी नरमाईची भूमिका घेते, याकडे पाहावे लागणार आहे. बाजार समितीसाठी विकास संस्था, ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान आहे. या संस्थांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची पकड असली तरी समितीमधील भ्रष्टाचाराबद्दल सामान्य माणसांत कमालीची चीड आहे. (प्रतिनिधी)