शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

नदी आणि खेड्यांमुळे झाली शहराची कोंडी, भविष्यकाळात नागरिकांच्या अडचणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:46 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : शहराच्या उत्तरेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिची पूररेषा, तर दक्षिणेकडील भागाला खेटून असलेली खेडी यामुळे ...

भारत चव्हाण

कोल्हापूर : शहराच्या उत्तरेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिची पूररेषा, तर दक्षिणेकडील भागाला खेटून असलेली खेडी यामुळे शहरात नवीन गृह प्रकल्प उभारणीवर कमालीच्या मर्यादा आल्या आहेत. शहराची होत असलेली कोंडी हद्दवाढीमुळे फुटेल, असे दिसत असताना आता त्यालाही खीळ बसली आहे. त्यामुळे भविष्यकाळात नागरिकांना जागा व नवीन घर घेणे अडचणीचे ठरणार आहे.

कोल्हापूर शहराचे क्षेत्रफल ६६.८२ किलोमीटर इतके मर्यादित आहे. शहराची लोकसंख्या, नागरी वस्ती मात्र झपाट्याने वाढली. १९७१ साली झालेल्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख २९ हजार ०५० एवढी होती, ती २०११ च्या जनगणनेनुसार ५ लाख ४९ हजार २३६ इतकी झाली. तर २०२१ पर्यंत ती आणखी वाढून साडेसहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या पन्नास वर्षांत चार लाखांनी लोखसंख्या वाढली, पण शहराचे क्षेत्रफळ वाढलेले नाही. त्यामुळे उपलब्ध जागेवरच शहरातील नागरिक दाटीवाटीने वसले आहेत.

पश्चिमेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिला आलेल्या तीन मोठ्या महापुरांमुळे नदीची पूररेषा चर्चेत आली. सध्या नदीच्या पूररेषेवर काम सुरू आहे. परंतु ती अंतीम झालेली नाही. मात्र, मागच्या दोन वर्षांत ज्या ज्या भागात महापुराचे पाणी आले होते, त्या त्या ठिकाणी नवीन बांधकामे अडचणीत आली आहेत. एक तर आहेत त्याच गृह प्रकल्पांना ग्राहक मिळेनात आणि नवीनही प्रकल्प उभारता येईनात.

शहराच्या ६६.८२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी नदी आणि पूररेषेतील सुमारे १५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील विकास आता जवळपास ठप्प झाला आहे. उर्वरित ५० ते ५२ चौरस किलोमीटरमध्ये खेळाची मैदाने, बगीचा, खुल्या जागा, तलाव, नाले व त्याचे झोन, आरक्षणातील जागा याशिवाय शहरात शेती महामंडळाची आरक्षित जागा, शिवाजी विद्यापीठ परिसर, कळंबा कारागृह आणि त्याचे निर्बंध यामुळे शहरात विस्ताराला संधीच उरलेली नाही.

- घर घेणे होणार महाग

एकीकडे पंचगंगा नदीकाठ व पूरक्षेत्रामुळे आलेल्या मर्यादा आणि दुसरीकडे शहराच्या पूर्व तसेच दक्षिण भागात वाढलेली नागरी वस्ती यामुळे जागा मिळविताना अडचणी येत आहेत. जागा मिळालीच तर त्याचे दर भरमसाठ आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे भविष्यकाळात घरांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतील.

-हद्दवाढ हाच पर्याय

शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच घरांच्या गर्दीमुळे भलतीच कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडायची असेल तर त्यावर एकच पर्याय म्हणजे शहराच्या हद्दवाढीचा आहे. म्हणूनच हद्दवाढ ही केवळ राजकीय मागणीच नाही तर ती भौगाेलिक गरज बनली आहे.

- लोकसंख्येच्या घनतने मर्यादा आलंडली

एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार १९९१ मध्ये शहरातील लोकसंख्येची दर चौरस किलोमीटरमागे ६०८२ इतकी होती. ती २०११ मध्ये ८९२० इतकी झाली. गेल्या दहा वर्षांत ती आणखी वाढली आहे. ही मर्यादा केंव्हाच ओलंडली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी