शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नदी आणि खेड्यांमुळे झाली शहराची कोंडी, भविष्यकाळात नागरिकांच्या अडचणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:46 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : शहराच्या उत्तरेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिची पूररेषा, तर दक्षिणेकडील भागाला खेटून असलेली खेडी यामुळे ...

भारत चव्हाण

कोल्हापूर : शहराच्या उत्तरेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिची पूररेषा, तर दक्षिणेकडील भागाला खेटून असलेली खेडी यामुळे शहरात नवीन गृह प्रकल्प उभारणीवर कमालीच्या मर्यादा आल्या आहेत. शहराची होत असलेली कोंडी हद्दवाढीमुळे फुटेल, असे दिसत असताना आता त्यालाही खीळ बसली आहे. त्यामुळे भविष्यकाळात नागरिकांना जागा व नवीन घर घेणे अडचणीचे ठरणार आहे.

कोल्हापूर शहराचे क्षेत्रफल ६६.८२ किलोमीटर इतके मर्यादित आहे. शहराची लोकसंख्या, नागरी वस्ती मात्र झपाट्याने वाढली. १९७१ साली झालेल्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख २९ हजार ०५० एवढी होती, ती २०११ च्या जनगणनेनुसार ५ लाख ४९ हजार २३६ इतकी झाली. तर २०२१ पर्यंत ती आणखी वाढून साडेसहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या पन्नास वर्षांत चार लाखांनी लोखसंख्या वाढली, पण शहराचे क्षेत्रफळ वाढलेले नाही. त्यामुळे उपलब्ध जागेवरच शहरातील नागरिक दाटीवाटीने वसले आहेत.

पश्चिमेकडून वाहणारी पंचगंगा नदी आणि तिला आलेल्या तीन मोठ्या महापुरांमुळे नदीची पूररेषा चर्चेत आली. सध्या नदीच्या पूररेषेवर काम सुरू आहे. परंतु ती अंतीम झालेली नाही. मात्र, मागच्या दोन वर्षांत ज्या ज्या भागात महापुराचे पाणी आले होते, त्या त्या ठिकाणी नवीन बांधकामे अडचणीत आली आहेत. एक तर आहेत त्याच गृह प्रकल्पांना ग्राहक मिळेनात आणि नवीनही प्रकल्प उभारता येईनात.

शहराच्या ६६.८२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी नदी आणि पूररेषेतील सुमारे १५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील विकास आता जवळपास ठप्प झाला आहे. उर्वरित ५० ते ५२ चौरस किलोमीटरमध्ये खेळाची मैदाने, बगीचा, खुल्या जागा, तलाव, नाले व त्याचे झोन, आरक्षणातील जागा याशिवाय शहरात शेती महामंडळाची आरक्षित जागा, शिवाजी विद्यापीठ परिसर, कळंबा कारागृह आणि त्याचे निर्बंध यामुळे शहरात विस्ताराला संधीच उरलेली नाही.

- घर घेणे होणार महाग

एकीकडे पंचगंगा नदीकाठ व पूरक्षेत्रामुळे आलेल्या मर्यादा आणि दुसरीकडे शहराच्या पूर्व तसेच दक्षिण भागात वाढलेली नागरी वस्ती यामुळे जागा मिळविताना अडचणी येत आहेत. जागा मिळालीच तर त्याचे दर भरमसाठ आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे भविष्यकाळात घरांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतील.

-हद्दवाढ हाच पर्याय

शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच घरांच्या गर्दीमुळे भलतीच कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडायची असेल तर त्यावर एकच पर्याय म्हणजे शहराच्या हद्दवाढीचा आहे. म्हणूनच हद्दवाढ ही केवळ राजकीय मागणीच नाही तर ती भौगाेलिक गरज बनली आहे.

- लोकसंख्येच्या घनतने मर्यादा आलंडली

एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार १९९१ मध्ये शहरातील लोकसंख्येची दर चौरस किलोमीटरमागे ६०८२ इतकी होती. ती २०११ मध्ये ८९२० इतकी झाली. गेल्या दहा वर्षांत ती आणखी वाढली आहे. ही मर्यादा केंव्हाच ओलंडली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी