शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री यांनी साधला माणगावच्या सरपंचांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:32 IST

रूकडी माणागव : कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'राज्याचे पालक' म्हणून करत असलेल्या कामाची 'प्रेरणा' घेवूनच आम्ही आमचे ...

रूकडी माणागव : कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'राज्याचे पालक' म्हणून करत असलेल्या कामाची 'प्रेरणा' घेवूनच आम्ही आमचे गाव निश्चितच कोरोनामुक्त करू, असा विश्वास माणगाव, ता. हातकणगंलेचे सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केला. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी राज्यातील पुणे, कोकण आणि नाशिक विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

संवादमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दौलत देसाई (ऑनलाइन), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव हे सहभागी होते.

संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच राजू मगदूम यांच्यासह राज्यात 'कोरोनामुक्त गाव' मोहीम प्रभावीपणे राबवित असलेल्या सरपंचांच्या कामाचे कौतुक केले.

माणगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही 'कोरोना दक्षता समिती'ची स्थापना केली. असून गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद केले. गावात मुख्य रस्त्यावर गेट तयार करुन कोरोना दक्षता समितीतील लोकांची नियुक्ती केली. अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत नागरिकांशिवाय अन्य नागरिकांना गावातून बाहेर पडण्यास व गावात प्रवेश करण्यास बंद केले. गावातील सर्व भागाचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. गावातील सर्व डॉक्टर, औषध दुकानदार यांची बैठक घेऊन कोरोनाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा वेळेत मिळवून देण्याबाबत विनंती केली. तसेच 'माझा वॉर्ड माझी जबाबदारी' या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याने आपापल्या वॉर्डात घरोघरी जाऊन लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तत्काळ दवाखान्यात जाण्याबाबत आवाहन केले.

गावात ३० बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर स्थापन करून याठिकाणी १० ऑक्सिजन बेड तयार करून घेतले. या ठिकाणी दाखल रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळवून देण्याची व्यवस्था केली. याबरोबरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी १५ बेडचे स्वतंत्र कोविड सेंटर उभारून या सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.

फोटो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जिल्हा परिषद दालनातून संवाद साधताना सरपंच राजू मगदूम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण मुख्यमंत्री यांनी साधला.