शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:03 IST

कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या.

ठळक मुद्देआराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर भाजप-ताराराणीकडून दिशाभूल 

कोल्हापूर : शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या.

या संदर्भात अंतिम निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी घेणार आहेत. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नसल्यामुळे या माध्यमातून आरोप करून दिशाभूल करण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरू असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.महापौर आजरेकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहराचा तिसरा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठीची निविदा प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून विविध कारणांनी शहराची एक इंचही वाढ होऊ शकलेली नाही; परंतु शहरीकरणामध्ये व लोकसंख्येत भरमसाट वाढ झालेली आहे.

या विकास आराखड्यामध्ये शहराची येत्या ३० वर्षांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन जागांसंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या विविध आपत्तींचाही हा आराखडा तयार करताना विचार करणे गरजेचे आहे.

या सभागृहाची मुदत येत्या दोन महिन्यांमध्ये संपणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे. हे काम कोणा एका विशिष्ट संस्थेलाच न मिळता या निविदेमध्ये निकोप स्पर्धा व्हावी, यासाठी प्रशासनाला पत्र देऊन निविदेत सुधारणा करण्याबाबत कळविले होते.यानुसार केलेल्या सुधारणेमुळे टेंडरला जास्त प्रतिसाद मिळाला. यामुळे निविदा प्रक्रियेमध्ये इतर पात्र संस्थांचा सहभाग झाल्याने कोणाच्या संबंधातील एखाद्या संस्थेला टेंडर मिळाले नाही. त्यामुळे याबद्दल आरोप करणे ही बाब चुकीची आहे.भाजप सत्तेवर असताना कोणती कामे केली?महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासाचे प्रश्न सुटत असल्याने तसेच विरोधाचे कोणतेही मुद्दे मिळत नसल्यामुळेच विरोधकांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. आमच्यावर आरोप करताना विरोधकांनी राज्यात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर असताना कोल्हापूर शहराच्या विकासाची कोणती ठोस कामे केली, याची माहितीही प्रसिद्ध करावी.जनतेच्या हिताची इतकी काळजी असेल तर त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी आपला वेळ सत्कारणी लावावा. महापालिकेची आगामी निवडणूक समोर दिसू लागल्यानेच विरोधकांकडून बिनबुडाचे व चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे आजरेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर