शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

आई-बाबा टिकविण्याचे आव्हान

By admin | Published: April 10, 2015 12:14 AM

सुनीलकुमार लवटे : ‘अवकाळ’ लघुपटाचा प्रदर्शन सोहळा

कोल्हापूर : आपल्यापुढे शेती टिकविण्याच्या आव्हानासोबतच आई-बाबा टिकविण्याचे मुख्य आव्हान आहे. वाढत्या शहरीकरणात माणसे दुरावत चालली आहेत. एकमेकांमधील दुरावा वाढत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. कृषी महाविद्यालयातील सभागृहात गुरुवारी चैतन्य डोंगरे व विनायक हेगाणा या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘अवकाळ’ लघुपट प्रदर्शन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. जी. जी. खोत होते. लवटे म्हणाले, आपल्या देशात फक्त निसर्गाचाच अवकाळ नसून संस्कृतीचा अवकाळ आहे, वागणुकीचा अवकाळ आहे. अजूनही या ठिकाणी गरीब-श्रीमंत असा भेद केला जातो. शेतकऱ्यांना फक्त आर्थिकदृष्ट्या पाठबळ देऊन उपयोग नाही, तर त्यांना मानसिकदृष्ट्या पाठबळ दिले पाहिजे. खोत म्हणाले, अवकाळी संकट आल्यानंतर शेतकऱ्याला लढ म्हणायची ताकद या लघुपटातून मिळणार आहे. संकटातून मार्ग कसा काढायचा, याचा संदेश यातून नक्कीच मिळतो. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांच्यासह कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कोमल पाटील यांनी प्रास्ताविक केले. विनायक हेगाणा यांनी आभार मानले. ५‘अवकाळ’बाबतया लघुपटाद्वारे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी गारपीट या संकटावर भाष्य केले आहे. शेतकऱ्यांनीही यामध्ये काहीतरी घेण्यासारखा व शासनाला, समाजाला यातील वास्तव दाखविले आहे. कृषी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विनायक हेगाणा याने या लघुपटाची कथा लिहिली आहे; तर शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशनचा प्रथम वर्षातील चैतन्य डोंगरे याने दिग्दर्शन केले आहे. यामध्ये शेतकऱ्याची भूमिका विनायकने, तर त्याच्या बहिणीची भूमिका कोमल पाटील यांनी साकारली आहे.