शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

...तर बळिराजा समृद्ध होईल

By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST

विनायक राऊत : किर्लोस कृषी विज्ञान रब्बी मेळाव्याचा समारोप

मालवण : कोकणच्या विकासात शेतीक्षेत्राचे स्थान मोठे आहे. दूध, अंडी, फळभाज्या व अन्य शेती उत्पादनात परावलंबी असलेल्या सिंधुदुर्गला स्वावलंबी आणि समृद्ध बनविण्यासाठी शेतीक्रांती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलून व्यावसायिक शेतीकडे वळली पाहिजे. व्यावसायिक शेतीतून येथील शेतकरी राजा नक्कीच समृद्ध होईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. भारतीय कृषी संशोधन परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे आयोजित तीन दिवसीय रब्बी मेळावा-कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची सांगता झाली. यावेळी अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, कल्याण-डोंबिवली नगरसेवक दशरथ घाडीगावकर, सुवर्ण कोकणचे सतीश परब, नगरसेवक गीते, संचालक बंडू सावंत, बाळासाहेब परुळेकर, नितीन सावंत, विज्ञान केंद्राचे पदाधिकारी, शेतकरी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. महामार्ग चौपदरीकरण, रेल्वे दुपदरीकरण, सावंतवाडी टर्मिनस, चिपी विमानतळ, कोस्टल रोड, कराड चिपळूण मार्गासह होणारा कोल्हापूर सोनवडे घाटमार्ग या मेगा प्रकल्पामुळे येत्या तीन वर्षांत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा नकाशा निश्चितच बदललेला असेल. कोकण विकासाच्या राजमार्गावर स्वार होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)शासनाने शेतीला विकासाचा केंद्र्रबिंदू ठेवावासुधीर सावंत म्हणाले, कोकणात शेतीतून प्रगती करताना उत्पादनवाढ महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने ‘मेक इन इंडिया’ आणि औद्योगिकरण हाच विकासाचा केंद्र्रबिंदू न ठेवता शेती, प्रगती आणि विकास यालाही महत्त्व दिले पाहिजे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही याकडे गांभीर्याने पाहून १० ते २३ टक्क्यांपर्यंत दर मिळणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्यास ती खरी क्रांती ठरेल. भारतात स्वातंत्र्यानंतर नांगर धरणारा नेता अथवा बडा अधिकारी झाला नाही. त्यामुळे शेतीचा विकास मागे पडला, असेही सावंत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले कृषी विषयक विचार मांडले. शासनाने शेतीला विकासाचा केंद्र्रबिंदू ठेवावासुधीर सावंत म्हणाले, कोकणात शेतीतून प्रगती करताना उत्पादनवाढ महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने ‘मेक इन इंडिया’ आणि औद्योगिकरण हाच विकासाचा केंद्र्रबिंदू न ठेवता शेती, प्रगती आणि विकास यालाही महत्त्व दिले पाहिजे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही याकडे गांभीर्याने पाहून १० ते २३ टक्क्यांपर्यंत दर मिळणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्यास ती खरी क्रांती ठरेल. भारतात स्वातंत्र्यानंतर नांगर धरणारा नेता अथवा बडा अधिकारी झाला नाही. त्यामुळे शेतीचा विकास मागे पडला, असेही सावंत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले कृषी विषयक विचार मांडले.