शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेतकरी विरोधी कुटील कारस्थान हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा, राजू शेट्टींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 5:28 PM

शेतकरी विरोधी हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार

अनिल पाटीलसरुड : इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले असतानाही शासन व साखर कारखानदारांनी एकरक्कमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तुकडे पाडण्याचे व ऊसाला अपेक्षीत दर न देण्याचे कुटील कारस्थान रचले आहे. त्यामुळे भविष्यात हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी  शेतकऱ्यांनी टोकाच्या संघर्षासाठी सज्ज रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. गावांच्या संपर्क दौऱ्याप्रसंगी सरुड येथे बोलताना त्यांनी हे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, उत्पादन खर्च पाहता २०१९ नंतर ऊस दरामध्ये अपेक्षित अशी दरवाढ झाली नाही. वास्तविक रासायनिक खते, मशागत खर्च, कीटक, तसेच तणनाशकांचा खर्च आदी खर्चामध्ये महागाईमुळे प्रचंड वाढ होऊन उत्पादन खर्च वाढला असताना त्या प्रमाणात ऊस दरामध्ये वाढ करणे गरजेचे होते. परंतु शासन तसेच साखर कारखानदारांकडून त्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.उलट एकरक्कमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तीन तुकडे पाडण्याचे कुटील कारस्थान सुरु आहे. शेतकरी विरोधी हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढकार घेणार असून संघटनेच्यावतीने लवकरच प्रत्येक गावा गावात सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उसाला प्रतिटन सातशे ते नऊशे रुपये जादा मिळावेतसाखर कारखान्यांकडून उत्पादित होत असलेल्या इथेनॉलच्या दरात वाढ झाल्याने सध्या इथेनॉलला चांगला दर मिळत आहे. इथेनॉलला मिळणारा हा दर पाहता साखर कारखान्यांना ऊसाला सध्या देत असलेल्या दरापेक्षा अधिक ७०० ते ९०० रु पर्यंत जादा दर देण्यास काही अडचण नाही असेही शेट्टी यांनी यावेळी मुद्यासह पटवुन सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने