शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आंबेओहळच्या अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न,८ धरणग्रस्तांवर गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:21 IST

Dam, Farmer, Crimenews, Police, kolhapur आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आठ धरणग्रस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्मक्लेश आंदोलन सुरू असताना उपविभागीय अभियंता दिनेश विठ्ठल खट्टे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा धरणग्रस्तांचा आरोपप्रांतकचेरीसमोर गुरूवारपासून आंदोलन करणार : श्रीपतराव शिंदे

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आठ धरणग्रस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्मक्लेश आंदोलन सुरू असताना उपविभागीय अभियंता दिनेश विठ्ठल खट्टे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केला.अधिक माहिती अशी, आंबेओहळ धरणग्रस्तांचे आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी शिवाजी धोंडीबा गुरव, सचिन विष्णू पावले, गणपत केरबा पावले, दिनकर बाळू पावले, शामराव दशरथ पुंडपळ, कल्पक पावले, सुरेश रामचंद्र पावले, राजू गोविंद पावले (रा. आर्दाळ, ता. आजरा) हे धरणस्थळावर गेले होते.काम बंद करा असे आवाहन धरणग्रस्त करत होते. काम बंद करीत नसल्याने धरणग्रस्त रॉकेल घेवून स्वत: आत्मदहन करण्यासाठी अंगावर ओतून घेवून पेटवून घेत होते. यावेळी शिवाजी गुरव यांनी रॉकेलचे कॅन व काड्याची पेटी काढून घेतली.यावेळी उपअभियंता खट्टे होते. यावेळी रॉकेलचे फवारे खट्टे यांचे अंगावर गेले असे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे.दरम्यान खट्टे यांनी आजरा पोलिसात दिलेल्या वर्दीवरून सचिन पावले, शिवाजी गुरव, गणपत पावले, दिनकर पावले, शामराव पुंडपळ, कल्पक पावले, सुरेश पावले, राजू पावले यांनी संगनमताने प्रकल्पस्थळी येवून कट रचून अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला.दरम्यान, चार वाजता पाटबंधारे विभागाने आठ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच धरणग्रस्त आक्रमक झाले. या घटनेची माहिती मिळताच उत्तूर पोलिस दूरक्षेत्रास माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, पं. स. सदस्य बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे यांनी भेट दिली.अ‍ॅड. शिंदे म्हणाले, २१ वर्ष धरणाचे काम बंद आहे, आणखी चार दिवस बंद झाले तर काय फरक पडणार आहे. आपण आंबेओहळ प्रकल्पाच्या पुर्नवसनाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बोललो असताना काम का सुरु केले. लोकांच्या भावनेचा विचार करावा. घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती वेगळी दाखवली आहे.परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये. घडलेली घटना निंदनीय असून धरणग्रस्तांच्या चळवळीच्या सर्व संघटना अटकेचा निषेध व पुनर्वसनासाठी प्रांत कार्यालय, गडहिंग्लज येथे आंदोलन करणार आहेत.यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, प्रकल्प अभियंता स्मिता माने, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसिलदार विकास अहिर, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे मंडल अधिकारी प्रशांत गुरव आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

पुनर्वसनाचा एक अधिकारी नाहीज्या न्याय मागण्यांसाठी पुनर्वसनाचा अधिकारी आत्मक्लेश आंदोलन सुरु असताना फिरकलेच नाहीत. पांटबधाऱ्याचे अधिकारी यांना काम पूर्ण करण्याचा दबाव असल्याने त्यांनी काम सुरू केले. मात्र, पुनर्वसनाचा अधिकारी फिरकलाच नाही. पुनर्वसन पूर्ण झाले असते तर ही घटना घडली नसती.

 वीस वर्षानंतर अटक सत्र२००१ मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याबद्ल ११३ धरणग्रस्तांना अटक करण्यात आली होती. २० वर्षानंतर ८ धरणग्रस्तांना सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचे धाडस केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला. शिवाजी गुरव यांना ताब्यात घेतले असून अन्य धरणग्रस्तांचा पोलिस शोध घेत आहेत.

काम नव्हे साफसफाईघळभरणीचे शासनाचे उदिष्ट असल्याने धरणस्थळावर जागा साफसफाई सुरु होती. पाणीसाठा करावयाचा होता. त्यामुळे इतर कामे सुरु होती. धरणग्रस्तांना वाटले आम्ही काम सुरू केले. धरणग्रस्तांनी आमच्या कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.महेश सुर्वे, मुख्य कार्यकारी अभियंता

चळवळीच्या संघटनांना आवाहनधरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल केले असून न्याय मागण्यासाठी रखडलेले पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी चळवळीच्या संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात संख्येने सहभागी व्हावे.अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, माजी आमदार. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDamधरणFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस