शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘आशा’दायी नेत्रदीपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:59 IST

स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या नेत्रदीपाचे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले आणी गळ्यात स्टेटसकोपच्या जागी वरमाळ पडली. गोव्यात जन्मलेली, लाडाकोडात वाढलेली नेत्रदीपा लग्नानंतर एकदम अबोल, हतबल, घरसंसाराच्या गाड्यात स्वत:ला जुंपलेली स्त्री बनली.

नसीम सनदी, कोल्हापूर.

स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या नेत्रदीपाचे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले आणी गळ्यात स्टेटसकोपच्या जागी वरमाळ पडली. गोव्यात जन्मलेली, लाडाकोडात वाढलेली नेत्रदीपा लग्नानंतर एकदम अबोल, हतबल, घरसंसाराच्या गाड्यात स्वत:ला जुंपलेली स्त्री बनली. पण त्यातूनही तिने जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आईच्या प्रेरणेने ‘आशा स्वयंसेविका’ म्हणून कामास सुरुवात करून नव्या वाटचालीला सुरुवात केली.

संघटना बांधली, जिल्हा, राज्यस्तरावर पदे भूषवून, दिल्लीत आवाज उठवला, एवढेच नव्हे तर ‘युनो’त देशाचे प्रतिनिधीत्व केले. ही अविश्वसनीय झेप घेताना आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाने मात्र ती कोलमडली. आत्महत्येच्या विचारापर्यंत गेली पण मैत्रिणीच्या पाठबळावर ती पुन्हा हिंमतीने उभी राहिली. ज्या संघटनेतून हाकलण्याची भाषा झाली त्याच संघटनेची नव्याने बांधणी करून राज्यात कुठेच नाही अशी फक्त महिलांचीच कार्यकारिणी असलेली संघटना बांधली आणि अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचा आदर्श घालून देत नव्या पर्वात दाखल झाली रणरागिणी बनूनच.

जिद्द, सचोटी संघर्षाची चित्रपट कथानकाप्रमाणे वाटचाल असलेल्या आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी आयुष्यात काटेरी मार्गावरून चालण्याची सवय लावूनच घेतली आहे. मात्र, हे करताना चेहºयावर दु:खाचा लवलेशही न दाखवता आजूबाजूच्या महिलांना आधार देणाºया नेत्रदीपा म्हणूनच आजच्या काळातील दुर्गा ठरल्या आहेत.

या दुर्गेत रंजल्या गांजलेल्यांसाठी कणव आहे, दुर्बलांसाठी मदतीचा हात देण्याची प्रवृत्ती आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची आणि उठवण्याची ऊर्मी आहे. स्वत:च्या आयुष्यातील संघर्ष, अडीअडचणी सोडवतानाच वंचितांसाठी धावून जाण्याची प्रवृत्ती ही आहे; पण ही दुर्गा एका दिवसात घडलेली नाही. त्यासाठी आयुष्याची बरीच वर्षे घालवावी लागली.

त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील उपळावी. वडील चंद्रकांत जाधव हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असल्याने नोकरीनिमित्त गोव्यात स्थायिक. गोव्यातीलच सांगेगोवाजवळील नेत्रावळी या गावात नेत्रदीपा यांचा जन्म झाला. शाळेत स्कॉलर विद्यार्थिनी, प्रत्येक उपक्रमांत हिरीरीने सहभाग नोंदवणारी म्हणूनच ओळख.

गुणवत्तेची शिखरे खुणावत असतानाच वयाच्या १२ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले आणि सर्व कुटुंब जत तालुक्यातील उमदी या मामाच्या गावी स्थायिक झाले. येथे पीठाची गिरण चालवत आईने मुलांचे पालनपोषण सुरू ठेवले. तेथेच शिरोळ येथील आत्तेभावाशी नेत्रदीपा यांचे वयाच्या १२ व्या वर्षीच लग्न ठरविण्यात आले, शिकण्याची इच्छा व्यक्त केल्याने दहावीनंतर लग्न झाले. नवºयाच्या परवानगीने पुढे ११ वी, १२ वी आणि एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले व सामाजिक कार्यात वाहून घेतले. आशा कर्मचाºयांची भक्कम संघटना उभी केली.

मात्र, यशाची कमान चढत असताना संघटनेतील अंतर्गत मतभेदावरून शारीरिक आणि मानसिक संघर्षाचा सामना करावा लागला. या प्रसंगाने नेत्रदीपा पुरत्या कोलमडून गेल्या. आत्महत्या करण्याचेही विचार डोक्यात आले पण आईचे संस्कार, संघटनेतील महिला, मैत्रिणी अर्चना आणि माया यांनी वाढवलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर नेत्रदीपा पुन्हा एकदा तळपण्यासाठी सज्ज झाल्या. आपली भूमिका ठामपणे मांडत त्यांनी संघटनेची नव्याने बांधणी सुरू केली. आशा या महिलाच असल्याने यात पुरुषांची लूडबूड कशासाठी, असे ठणकावून सांगत महिलांचीच कार्यकारिणी असलेली संघटना उभारली.

देशाचे प्रतिनिधीत्व केल्याचा अभिमानआशा कर्मचाऱ्यांना मानधन, भत्ते, ड्रेस यासाठी आग्रह धरला. मुख्य सचिवांपर्यंत व्यथा मांडल्या. राज्यभरातील २२ हून अधिक जिल्ह्यात फिरून आशांचे संघटन केले. ‘डब्ल्यूएचओ’ संघटनेत जगभरातील १७५ देशांच्या प्रतिनिधींसमोर भारताची प्रतिनिधी म्हणून सादरीकरण केले.

                                                                    

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर