शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

यळगूडच्या पाणीपुरवठा योजनेचा खेळ केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:25 IST

योजना राबविण्याच्या कार्यात सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या खेळखंडोबामुळे भविष्यात संपूर्ण गावाची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढणार आहे. भविष्यात गावाला अपुऱ्या, अशुद्ध व ...

योजना राबविण्याच्या कार्यात सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या खेळखंडोबामुळे भविष्यात संपूर्ण गावाची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढणार आहे. भविष्यात गावाला अपुऱ्या, अशुद्ध व बेभरवशाच्या पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अपुऱ्या स्वरूपाची ही योजना राबविण्याबाबतचा ग्रामपंचायतीने फेरविचार करावा, अशी मागणीही त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गावच्या अत्यंत जिव्हाळ्याची व निकडीची समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी गट म्हणावा तसा काळजीपूर्वक प्रयत्न करीत नाही असे चित्र अनुभवण्यास मिळत आहे. सुमारे दहा हजार लोकसंख्येसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या आराखड्यात जलशुद्धिकरण केंद्र व जलकुंभाचा समावेश नाही, अशा योजनेचे भवितव्य काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यापूर्वी शासकीय योजनेतून राबविण्यात येणाऱ्या पाच कोटी रुपये खर्चाच्या योजनेत काहीतरी त्रुटी काढून ही योजना राबविण्यामध्ये याच सत्ताधाऱ्यांनी खो घातला होता. पाच कोटी रुपये खर्चाची योजना नाकारून ही मंडळी आता एक कोटी रुपये खर्चाची योजना राबवून गावचा पाण्याचा प्रश्न कसा सोडविणार आहेत?

याबाबत सरपंच सुनिता हजारे म्हणाल्या, गावचा पाणीप्रश्न संपुष्टात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा खर्च हा सुमारे पाच कोटीपेक्षा जास्त होऊ लागला. त्यामुळे ही योजना राबविण्याचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे जातात. परिणामी योजना राबविण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे.