शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आजरा साखर कारखान्याने भरले ६९ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST

कोल्हापूर : गेली दोन वर्षे बंद असलेला गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग सोमवारी ...

कोल्हापूर : गेली दोन वर्षे बंद असलेला गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग सोमवारी मोकळा झाला. जिल्हा बँकेचे तब्बल ६९ कोटी रुपयांचे कर्ज सामूहिक प्रयत्नातून भरण्यात आले. त्यामुळे नव्या कर्जासाठी कारखाना पात्र ठरला आहे. ‘लोकमत’ने हा कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन गेल्या महिन्यात पाच भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.

उसाचे कमी झालेले गाळप, साखर दरातील अनिश्चितता, कर्जाचे व्याज या सगळ्यातून आजरा साखर कारखाना गेली दोन वर्षे अडचणीत येऊन बंद पडला होता. सहकारी तत्त्वावरून अडचणीत येऊन खासगी समूहाकडे चालवण्यासाठी दिलेला राज्यातील पहिला कारखाना अशी नोंद झालेला हा कारखाना पुन्हा एकदा कोणाला तरी चालवायला द्यावा लागणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्यांना अन्य मान्यवरांनी केलेले सहकार्य, कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे आणि त्यांच्या सर्व सहकारी संचालकांनी सातत्याने यश-अपयशाचा विचार न करता केलेले प्रयत्न, यासाठी मुंबईपर्यंत मारलेल्या फेऱ्या सार्थकी लागल्या.

तब्बल ६९ कोटी रुपये भरल्याशिवाय कारखान्याला नवे कर्ज देता येणार नव्हते आणि नवीन कर्ज दिल्याशिवाय कारखाना सुरूच होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांसाठी का असेना इतकी रक्कम कशी गोळा करायची, असा मोठा प्रश्न होता. परंतु मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह विविध सहकारी संस्था यांनी केलेल्या सहकार्यामुळे सोमवारी अखेर ६९ कोटी रुपये जिल्हा बँकेत भरण्यात आले.

अध्यक्ष सुनील शिंत्रे, संचालक आणि जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी, संचालक सुधीर देसाई, अनिल फडके, कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, रमेश वांगणेकर यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. येत्या काही दिवसांत रीतसर जिल्हा बँक नव्याने आजरा कारखान्यासाठी कर्जपुरवठा करणार आहे. त्यामुळे येणारा गळीत हंगाम सुरू होणार आहे.

चौकट

पवार ते ठाकरे

आजरा कारखाना सहकारी तत्त्वावर चालू रहावा यासाठी संचालक मंडळाने जोरदार प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्यासोबत कोल्हापूर, मुंबई येेथे अनेक बैठका झाल्या. सर्व बैठकांमधून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या हसन मुश्रीफ यांना याप्रश्नी मार्ग काढावा, अशी त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. त्यानुसार मुश्रीफ यांनी सोमवारी त्यांच्याकडून हा विषय संपवला.