शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

एजंटांना अल्टीमेटम

By admin | Updated: November 11, 2014 23:26 IST

‘पर्ल्स’चा घोटाळा : पैसे परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांचा तगादा

गणपती कोळी - कुरुंदवाड -पर्ल्स कंपनीचे आर्थिक घोटाळे उघडकीस आल्याने गुंतवणूकदार, ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहक एजंटांचे उंबरे झिजवत असून, ग्राहकांच्या भीतीने अनेक एजंट गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या रडारवर पर्ल्स एजंट असून, त्यांना ग्राहकांकडून वसुलीबाबत अल्टीमेटम दिला जात आहे.अल्प कालावधीत दुप्पट परतावाच्या आमिषाला अशिक्षितांपासून उच्च शिक्षितही बळी पडले आहेत. एजंटांनाही भरघोस कमिशन देण्याच्या कंपनीच्या भूमिकेमुळे गुंतवणूक करणाऱ्या एजंटांची संख्याही वाढलीे. कंपनीचा एजंट होण्यासाठी ना शिक्षणाची अट, ना मार्केटिंग प्रमाणपत्राची. केवळ ग्राहकाला आकर्षित करून घेण्याची कला अवगत असणारा असल्यास छोट्या गावांपासून शहरांपर्यंत मोठ्या संख्येने एजंट झाले आहेत. एजंटांनी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, शेजारी यांनाच प्रथम ग्राहक बनविले आहे. ठेवी घेतानाही कंपनीचा आदर्शवत कामाचा पाढा गिरवत ‘तुमच्या पैशाला मी जबाबदार आहे,’ असा विश्वास दिल्याने अनेक ग्राहकही त्यांच्या विश्वासाला बळी पडले आहेत. एजंटांना मिळणारे भरघोस कमिशन यामुळे त्यांच्या राहणीमानात तर फरक पडलाच शिवाय अवघ्या सहा महिन्यांत ते एक वर्षात दोन चाकी, चार चाकी गाड्या घेऊन फिरू लागल्याने अल्पावधीत त्यांना मिळालेली श्रीमंती पाहून लोकही अचंबित झाले. मात्र, ग्राहकाला अल्पावधीत दुप्पट परतावा देण्याबरोबर एजंटांना मोठे कमिशन देणे कंपनीला कसे शक्य आहे, याचा गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाने कधीच विचार केला नाही. आता कंपनीच्या आर्थिक घोटाळ्यांतून हे गुपित स्पष्ट झाले असून, गुंतवणूकदार, ठेवीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. कंपनीचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने ग्राहक एजंटांकडे धाव घेऊन गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांचा जाब विचारीत आहेत. ग्राहकांचा रोष पाहून अनेक एजंट गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची पाचावर धारण बसली आहे. फसवणूक झालेले ग्राहक एकत्र येऊन एजंटाला कोणत्याही परिस्थितीत ठरावीक पैसे परत देण्याचा अल्टीमेटम देत आहेत. त्यामुळे एजंट मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत.