शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या पॅकेजनंतरही अडचणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:08 IST

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असले तरी साखरेचा किमान विक्रीदर वाढविला नसल्याने कारखान्यांसमोरील अडचणी कायम राहणार आहेत. नव्या गळीत हंगामात उसाची एफआरपीही एकरकमी देता येणार येणार नाही. त्यामुळे साखरेचा किमान विक्रीदर ३५ रुपये करण्याबाबत सरकारने लवकर निर्णय ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असले तरी साखरेचा किमान विक्रीदर वाढविला नसल्याने कारखान्यांसमोरील अडचणी कायम राहणार आहेत. नव्या गळीत हंगामात उसाची एफआरपीही एकरकमी देता येणार येणार नाही. त्यामुळे साखरेचा किमान विक्रीदर ३५ रुपये करण्याबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी साखर उद्योगाची मागणी आहे.देशात आॅक्टोबरपासून नवा साखर हंगाम सुरू होत आहे. महाराष्टÑात २० आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. गेले वर्षभर अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाने या उद्योगाला छळले आहे. दर घसरल्याने ते वाढावेत यासाठी केंद्र सरकारनेही विविध उपाययोजना केल्या असल्या तरी हंगामाच्या सुरुवातीलाच १०० लाख टन साखर शिल्लक आहे. शिवाय नव्या हंगामात ३५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेऊनच केंद्राने बुधवारी ५० लाख टन साखर निर्यातीसाठी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यात ऊस उत्पादकांना प्रतिटन १३८ रुपये ८० पैसे थेट अनुदान, साखर निर्यातीला प्रतिटन १००० ते ३००० पर्यत वाहतूक अनुदानाचा समावेश आहे. यामुळे कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेमागे साधारणपणे १५० रुपये मिळतील. यामुळे साखरेला मिळणारी किंमत ३१५० रुपये इतकी होते. उत्पादन खर्च किमान ३४०० रुपये प्रतिक्विंटल धरला तरी १५० रुपयांचा दुरावा राहतो. तो भरून काढण्यासाठी साखर विक्री दरात किमान २५० रुपये वाढ करून तो ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला पाहिजे किंवा यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र पॅकेज जाहीर केले पाहिजे, तरच कारखान्यांचा साखरेचा उत्पादन खर्च भरून निघू शकेल. त्यामुळे केंद्राने साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे साखर उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.एफआरपी तीन टप्प्यांत देण्यास परवानगी द्याकेंद्राच्या उपाययोजनानंतरही कारखाने उसाची एफआरपी एकरकमी देण्याच्या स्थितीत नाहीत. कारण सरकारने देऊ केलेल्या अनुदानाची रक्कम लगेच मिळत नाही. उसाची बिले मात्र कारखान्यात आलेल्या दिवसापासून १४ दिवसांत देण्याचे बंधन आहे. ते पाळण्यासाठी कारखान्यांकडे तेवढे खेळते भांडवल नाही. शिवाय राज्य सहकारी बॅँकही एक्सपोजर लिमिट संपल्याने डिसेंबरनंतर कारखान्यांना पैसे देऊ शकणार नाही. साखर विक्रीच्या कोटा पद्धतीमुळे जादा साखरही विकता येणार नाही. त्यामुळे एफआरपी तीन टप्प्यांत देण्याला कारखान्यांना सरकारने परवानगी दिली, तरच नवा हंगाम साखर उद्योगासाठी सुरळीत जाईल.