शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:05 IST

जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींसाठी ‘काॅंटे की टक्कर’. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींसाठी उद्या (रविवारी) मतदान होत आहे. त्यासाठी शनिवारी केंद्रनिहाय ३ हजार ७४० बॅलेट युनिट आणि २ हजार ७९९ कंट्रोल युनिटचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ८२७ केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ९ हजार १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच ही मतदानाची वेळ आहे.जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी माघारीनंतर ४५ ग्रामपंचायतींवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत. त्यामुळे आता ४२९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ‘काॅंटे की टक्कर’ होणार आहे. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

रविवारी होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून, जिल्ह्यातील १ हजार ८२७ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी ३ हजार ९४० ईव्हीएम मशीन तयार ठेवण्यात आल्या असून, एखाद्या केंद्रावर अचानक मशीन बंद पडले तर पर्यायी व्यवस्था म्हणून त्या-त्या तहसील कार्यालयात १० टक्के मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत.रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार असल्याने आज (शनिवारी) त्या-त्या भागातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. करवीरमधील साहित्य वाटप रमणमळा येथे होणार आहे. लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक दिवस आधीच केंद्र असलेल्या गावांमध्ये निवासासाठी जाण्यास सांगितले आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांसह शिक्षक असे ९ हजारांवर कर्मचारी यादिवशी कार्यरत राहणार आहेत. दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी ग्रामपंचायत विभागाकडून जाहीर केली जाणार आहे.मतदान केंद्रांवर १४४ कलम लागूनिवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी उद्या रविवारी मतदान केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी सायंकाळी हा आदेश काढला असून त्यानुसार मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे, मोबाइलचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक